शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा शाळा महत्त्वाची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

आम्ही चाचण्या करतो, विद्यार्थ्यांचे काय? : शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांमध्येही नाराजी नागपूर : ५ महिन्यापासून घरात बसून खात आहेत, ...

आम्ही चाचण्या करतो, विद्यार्थ्यांचे काय? : शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांमध्येही नाराजी

नागपूर : ५ महिन्यापासून घरात बसून खात आहेत, असा आमच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे आम्ही विरोध तरी कसा करावा, मात्र आम्ही विद्यार्थी हित जाणतो. विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा शाळा महत्त्वाची नाही. सरकारने सांगितल्यानुसार आम्ही चाचण्या करूनही घेत आहोत. पण विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल करीत शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

२३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होत असल्याने २२ पर्यंत शिक्षकांना कोरोनाची चाचणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाला द्यायचा आहे. शुक्रवारपर्यंत नागपूर शहरातील ३० टक्के शिक्षकांनी कोरोनाची चाचणी केली होती. शनिवारी मात्र शहरातील सर्वच चाचणी केंद्रावर शिक्षकांची गर्दी झाली होती. नागपूर शहरात ९ ते १२ वर्गाच्या ५९३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यात जवळपास ६२५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील काही चाचणी केंद्रावर भेट दिली असता, शिक्षकांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. आम्ही चाचण्या केल्या मात्र विद्यार्थ्यांच्या चाचण्यांचे काय? एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर अख्ख्या शाळेला त्याचा धोका आहे. इतर राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर काय? परिस्थिती झाली, याचा आढावा सरकारने घ्यायला हवा होता. ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. आपत्कालीन स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. आम्हाला शिकवायला काहीच हरकत नाही. पण विद्यार्थ्यांच्या जीवाचे बघा, असा सल्ला शिक्षकांनी दिला.

- कोरोनाच्या भीतीपोटी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केले. मग विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा भरविण्याचे काय औचित्य आहे. आमदार, मंत्री, अधिकारी यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो तर विद्यार्थ्यांच्या जीवाला का नाही?

डॉ. जयंत जांभुळकर, महासचिव, काँग्रेस शिक्षक सेल

- डिसेंबरपर्यंत शाळा सुरू झाल्या नसत्या तरी काहीच फरक पडला नसता. महामारीच्या परिस्थितीत शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवर उगाच प्रयोग करीत आहे. १०० वर्षातून अशी परिस्थिती एखाद्यावेळी येते. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे सरकारचे काम आहे.

योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

- सरकारने शाळा सुरू करण्याचा अट्टहास धरून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. आमचे म्हणणे आहे ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू करू नये. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जीवास काही झाल्यास आम्ही शासन व प्रशासनाच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवू.

नागो गाणार, शिक्षक आमदार