शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा शाळा महत्त्वाची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

आम्ही चाचण्या करतो, विद्यार्थ्यांचे काय? : शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांमध्येही नाराजी नागपूर : ५ महिन्यापासून घरात बसून खात आहेत, ...

आम्ही चाचण्या करतो, विद्यार्थ्यांचे काय? : शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांमध्येही नाराजी

नागपूर : ५ महिन्यापासून घरात बसून खात आहेत, असा आमच्यावर आरोप होत आहे. त्यामुळे आम्ही विरोध तरी कसा करावा, मात्र आम्ही विद्यार्थी हित जाणतो. विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा शाळा महत्त्वाची नाही. सरकारने सांगितल्यानुसार आम्ही चाचण्या करूनही घेत आहोत. पण विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल करीत शाळा सुरू करण्यावरून शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

२३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होत असल्याने २२ पर्यंत शिक्षकांना कोरोनाची चाचणी करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाला द्यायचा आहे. शुक्रवारपर्यंत नागपूर शहरातील ३० टक्के शिक्षकांनी कोरोनाची चाचणी केली होती. शनिवारी मात्र शहरातील सर्वच चाचणी केंद्रावर शिक्षकांची गर्दी झाली होती. नागपूर शहरात ९ ते १२ वर्गाच्या ५९३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यात जवळपास ६२५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील काही चाचणी केंद्रावर भेट दिली असता, शिक्षकांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. आम्ही चाचण्या केल्या मात्र विद्यार्थ्यांच्या चाचण्यांचे काय? एखादा विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर अख्ख्या शाळेला त्याचा धोका आहे. इतर राज्यात शाळा सुरू झाल्यानंतर काय? परिस्थिती झाली, याचा आढावा सरकारने घ्यायला हवा होता. ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. आपत्कालीन स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. आम्हाला शिकवायला काहीच हरकत नाही. पण विद्यार्थ्यांच्या जीवाचे बघा, असा सल्ला शिक्षकांनी दिला.

- कोरोनाच्या भीतीपोटी नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केले. मग विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून शाळा भरविण्याचे काय औचित्य आहे. आमदार, मंत्री, अधिकारी यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो तर विद्यार्थ्यांच्या जीवाला का नाही?

डॉ. जयंत जांभुळकर, महासचिव, काँग्रेस शिक्षक सेल

- डिसेंबरपर्यंत शाळा सुरू झाल्या नसत्या तरी काहीच फरक पडला नसता. महामारीच्या परिस्थितीत शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवर उगाच प्रयोग करीत आहे. १०० वर्षातून अशी परिस्थिती एखाद्यावेळी येते. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे सरकारचे काम आहे.

योगेश बन, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

- सरकारने शाळा सुरू करण्याचा अट्टहास धरून गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. आमचे म्हणणे आहे ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू करू नये. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जीवास काही झाल्यास आम्ही शासन व प्रशासनाच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवू.

नागो गाणार, शिक्षक आमदार