शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाळकरी मुलाचे अपहरण

By admin | Updated: January 8, 2016 03:34 IST

१४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूर : १४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. चैतन्य सुभाष आष्टनकर असे अपहृत मुलाचे नाव आहे. तो मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीतील रहिवासी आहे. चैतन्यच्या आई सुनंदा (वय ४८) आणि वडील सुभाष (वय ५३) दोघेही शिक्षक आहेत. त्याला गायत्री (वय २१) आणि हर्षदा (वय १९) या दोन बहिणी आहेत. जामठा फाटा जवळच्या माऊंटफोर्ट स्कूलमध्ये आठवीत शिकणारा चैतन्य रोज सकाळी ६.४५ ला स्कूलबसने शाळेत जातो आणि २.३० ते ३ च्या दरम्यान बसनेच घरी परततो. नेहमीप्रमाणे आज दुपारी २.४० ला तो बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ बसमधून मित्रासह उतरला. पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचे निवासस्थान असल्याने तो तेथून घराजवळ आला. अचानक सिल्वर कलरची मारूती इको कार आली. त्यातील एक पांढरा शर्ट घातलेला आरोपी उतरला आणि नवनीत डेकोरेशनच्या फलकाजवळून त्याने चैतन्यला कारमध्ये कोंबले. लगेच ही कार सुसाट वेगाने पुढे निघाली. अवघ्या दोन मिनिटातच अपहरणकर्त्यांनी डाव साधला. चैतन्यसोबत घराकडे निघालेला अन २०० फूट अंतरावर असलेल्या मित्राने हा प्रकार बघितला. चैतन्यचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच हादरलेला तो मुलगा धावतच स्वत:च्या घरी गेला. त्याने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्याच्या आईने लगेच गायत्रीला (चैतन्यची बहीण) तर गायत्रीने सुनंदा आष्टनकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. सुनंदा यांनी त्यांचे पती सुभाष यांना ही माहिती कळविली. त्यानंतर सुभाष आष्टनकर आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसह सोनेगाव पोलीस ठाण्यात पोहचले. शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. (प्रतिनिधी)अपहरणकर्ते आणि कारण गुलदस्त्यातमाहिती कळताच परिमंडळ - १ चे उपायुक्त शैलेष बलकवडे सोनेगाव ठाण्यात पोहचले. त्यांनी चैतन्यच्या परिवारातील सदस्यांकडून बारीकसारीक माहिती मिळवत या अपहरणामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आष्टनकर परिवार मूळचा गुमगाव (हिंगणा) परिसरातील रहिवासी असून, पती-पत्नी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत शाळेत (घराबाहेर) असतात. चैतन्यसुद्धा सालस स्वभावाचा असून, आपले कुणाशी वैर नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. कुणावरही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले. अपहरणाची घटना घडून ५ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अपहरणकर्ते किंवा त्यांच्या साथीदारांपैकी कुणाचाच आष्टनकर परिवारात फोन आला नाही. यामुळे या प्रकरणातील अपहरणकर्त्यांसोबतच अपहरणाचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, खंडणीसाठीच हे अपहरण करण्यात आले असावे, असा अंदाज आहे. त्यांनी चैतन्यची आधी माहिती काढूनच त्याचे अपहरण केले असावे, असा कयास पोलिसांनी लावला आहे. दहा पथकांकडून तपासगेल्या पाच वर्षांत शहरात घडलेल्या कुश कटारिया, युग चांडक आणि विक्की बोरकर अपहरण आणि हत्याकांडाची तसेच गेल्या महिन्यात जरीपटक्यातील बहीण भावाचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने उपराजधानीकरांच्या मनात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे चैतन्यचे अपहरण झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियच नव्हे तर नागपूरकरांसह पोलीसही हादरले आहेत. त्याचा तातडीने शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेसह अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कामी लावण्यात आले आहे. पोलिसांची दहा पथके चैतन्य आणि त्याचे अपहरण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.