शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलाचे अपहरण

By admin | Updated: January 8, 2016 03:34 IST

१४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.

नागपूर : १४ वर्षाच्या शाळकरी मुलाचे मनीषनगरातून अपहरण झाल्यामुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. चैतन्य सुभाष आष्टनकर असे अपहृत मुलाचे नाव आहे. तो मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीतील रहिवासी आहे. चैतन्यच्या आई सुनंदा (वय ४८) आणि वडील सुभाष (वय ५३) दोघेही शिक्षक आहेत. त्याला गायत्री (वय २१) आणि हर्षदा (वय १९) या दोन बहिणी आहेत. जामठा फाटा जवळच्या माऊंटफोर्ट स्कूलमध्ये आठवीत शिकणारा चैतन्य रोज सकाळी ६.४५ ला स्कूलबसने शाळेत जातो आणि २.३० ते ३ च्या दरम्यान बसनेच घरी परततो. नेहमीप्रमाणे आज दुपारी २.४० ला तो बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ बसमधून मित्रासह उतरला. पाच मिनिटांच्या अंतरावर त्याचे निवासस्थान असल्याने तो तेथून घराजवळ आला. अचानक सिल्वर कलरची मारूती इको कार आली. त्यातील एक पांढरा शर्ट घातलेला आरोपी उतरला आणि नवनीत डेकोरेशनच्या फलकाजवळून त्याने चैतन्यला कारमध्ये कोंबले. लगेच ही कार सुसाट वेगाने पुढे निघाली. अवघ्या दोन मिनिटातच अपहरणकर्त्यांनी डाव साधला. चैतन्यसोबत घराकडे निघालेला अन २०० फूट अंतरावर असलेल्या मित्राने हा प्रकार बघितला. चैतन्यचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच हादरलेला तो मुलगा धावतच स्वत:च्या घरी गेला. त्याने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्याच्या आईने लगेच गायत्रीला (चैतन्यची बहीण) तर गायत्रीने सुनंदा आष्टनकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. सुनंदा यांनी त्यांचे पती सुभाष यांना ही माहिती कळविली. त्यानंतर सुभाष आष्टनकर आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसह सोनेगाव पोलीस ठाण्यात पोहचले. शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. (प्रतिनिधी)अपहरणकर्ते आणि कारण गुलदस्त्यातमाहिती कळताच परिमंडळ - १ चे उपायुक्त शैलेष बलकवडे सोनेगाव ठाण्यात पोहचले. त्यांनी चैतन्यच्या परिवारातील सदस्यांकडून बारीकसारीक माहिती मिळवत या अपहरणामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आष्टनकर परिवार मूळचा गुमगाव (हिंगणा) परिसरातील रहिवासी असून, पती-पत्नी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत शाळेत (घराबाहेर) असतात. चैतन्यसुद्धा सालस स्वभावाचा असून, आपले कुणाशी वैर नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. कुणावरही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले. अपहरणाची घटना घडून ५ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अपहरणकर्ते किंवा त्यांच्या साथीदारांपैकी कुणाचाच आष्टनकर परिवारात फोन आला नाही. यामुळे या प्रकरणातील अपहरणकर्त्यांसोबतच अपहरणाचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, खंडणीसाठीच हे अपहरण करण्यात आले असावे, असा अंदाज आहे. त्यांनी चैतन्यची आधी माहिती काढूनच त्याचे अपहरण केले असावे, असा कयास पोलिसांनी लावला आहे. दहा पथकांकडून तपासगेल्या पाच वर्षांत शहरात घडलेल्या कुश कटारिया, युग चांडक आणि विक्की बोरकर अपहरण आणि हत्याकांडाची तसेच गेल्या महिन्यात जरीपटक्यातील बहीण भावाचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने उपराजधानीकरांच्या मनात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे चैतन्यचे अपहरण झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि आप्तस्वकियच नव्हे तर नागपूरकरांसह पोलीसही हादरले आहेत. त्याचा तातडीने शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेसह अन्य पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कामी लावण्यात आले आहे. पोलिसांची दहा पथके चैतन्य आणि त्याचे अपहरण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.