शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

By admin | Updated: July 7, 2014 00:56 IST

महाविद्यालय व विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राखीव संवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. याच धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या

गरीब विद्यार्थ्यांना लाभ : आॅनलाईन भरावे लागणार अर्जवरोरा : महाविद्यालय व विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या राखीव संवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती दरवर्षी दिली जाते. याच धर्तीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती देण्याचे शासनाने ठरविले आहे.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक अंतर्गत राज्यातील शेकडो अभ्यास केंद्रातून विविध अभ्यासक्रम मागील काही वर्षांपासून शिकविले जात आहेत. शासकीय व खासगी सेवेत कार्यरत असताना नियमीत महाविद्यालयात नियमाप्रमाणे शिक्षण घेता येत नाही किंवा व्यवसाय करून वेळेअभावी शिक्षण घेता येत नाही. अशा व्यक्तींनी शिक्षणापासून वंचीत राहु नये, याकरिता मुक्त विद्यापिठ महाराष्ट्रातील शेकडो अभ्यासक्रमा केंद्रातून शिक्षण देत असते. मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके तसेच मार्गदर्शन करण्यात येते व शैक्षणिक सत्राच्या अखेरीस परीक्षा घेण्यात येते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्यानंतर ही पदवी इतर विद्यापिठाच्या समकक्ष असल्याने अनेक होतकरू तसेच परिस्थितीअभावी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठा कायापालट झाल्याचे दिसून येत आहे. मुक्त विद्यापिठात प्रवेश घेताना प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क आकारण्यात येते. या शुल्काचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसू नये, याकरिता शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विशेष समाज कल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांच्यामार्फत भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी अर्ज आॅनलाईन भरावा लागणार आहे. त्यात युजर आयडी, पासवर्ड प्रवेश घेतलेल्या अभ्यास केंद्रात द्यावे लागणार आहेत. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र आदी शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. या शिष्यवृत्तीचा लाभ मुक्त विद्यापिठातून शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरून विद्यार्थ्यांना होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)