शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

शिष्यवृत्तीचा निधी ११ वर्षांपासून वाढलाच नाही; विद्यार्थी शिकणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 07:00 IST

Nagpur News education एकीकडे सरकार विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी करते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. राज्य व केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या ११ वर्षांपासून वाढवण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देलाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : एकीकडे सरकार विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी करते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. राज्य व केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या ११ वर्षांपासून वाढवण्यात आलेली नाही. तेव्हा सध्याच्या महागाईचा विचार केल्यास शिष्यवृत्तीच्या भरवशावर असणारे मागासवर्गीय विद्यार्थी शिकणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक अशी शिष्यवृत्ती दिली जाते. पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती ही केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून देत असते. यात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के तर राज्य सरकारचा वाटा ४० टक्के इतका आहे. यात ११ व्या वर्गापासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यातही प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल असे दोन प्रकार आहेत. प्रोफेशनलसाठी दर महिन्याला ५५० रुपये तर नॉन प्रोफेशनलसाठी ३३० रुपये असा दर निश्चित करण्यात आलेला आहे. मुळात हे दर २००९ पासूनचे आहेत. ११ वर्षात सर्वच वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे तेच दर आजही लागू असल्याने लाखो विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. हीच अवस्था प्री-मॅट्रिक शिष्यवृ्तीची आहे. यात एसएसी, एसटी ओबीसी, भटके विमुक्त या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना ५ वी ते ७ वी ६० रुपये व ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना १०० रुपये महिना मिळतो. आजच्या परिस्थितीत ही रक्कमसुद्धा वाढवण्याची गरज आहे.

मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी दर ३ वर्षांनी शिष्यवृत्ती वाढवून द्यावी, असे आदेश काढले होते. त्यानंतर दर तीन वर्षांनी शिष्यवृत्तीची रक्कम वाढवताना ते दर नेहमी वाढीव दराने वाढवण्यात आले. मात्र सन २०१० पासून शिष्यवृत्तीचे दर वाढवण्यातच आलेले नाही. महागाई निर्देशाप्रमाणे वाढणे तर दूरच राहिले मात्र साध्या दराने सुद्धा वाढविलेले नाहीत. त्यामुळे २०१० ते २०२० पर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यातच आली नाही. त्यामुळे लाखो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

 मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे कोट्यवधीचे नुकसान

गेल्या ११ वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे. परंतु शिष्यवृत्ती वाढलेली नाही. या दरम्यान मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीत मागसवर्गीय विद्यार्थी शिकणार तरी कसे? केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

-कृष्णा इंगळे, अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र