शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

संविधानासह महापुरुषांच्या पुस्तकांवरील सवलतीची योजना बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 11:25 IST

Nagpur News भारतीय संविधान आणि महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत, या उद्देशाने सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या बार्टीतर्फे या पुस्तकांवर ८५ टक्के सवलतीची योजना जाहीर करण्यात आली होती. परंतु ही योजना बारगळली असून, मागील दोन वर्षांपासून पुस्तक विक्रीच बंद पडली आहे.

ठळक मुद्देबार्टीतर्फे दिली जात होती ८५ टक्के सवलतदोन वर्षांपासून पुस्तक विक्रीच नाही

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संविधान आणि महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत, या उद्देशाने सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या बार्टीतर्फे या पुस्तकांवर ८५ टक्के सवलतीची योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु ही योजना बारगळली असून, मागील दोन वर्षांपासून पुस्तक विक्रीच बंद पडली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे साहित्य, तसेच भारतीय संविधानाची प्रत लोकांपर्यंत पोहोचावी, सर्वांनी ती वाचावी, यातून एक आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, या उद्देशाने बार्टीने ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार ग्रंथांच्या मूळ किमतीवर ८५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात हाेती. १०० रुपयांचे पुस्तक १५ रुपयांना मिळत होते. त्यामुळे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिणामी वाचनप्रेमींची संख्या वाढली. यातून एकमेकांना ग्रंथ भेट देण्याची नवी प्रथाही सुरू झाली होती. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते असोत किंवा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार लोक असोत कोणत्याही उपक्रमात या मंडळींनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून महामानवाचे पुस्तक किंवा संविधानाची प्रत लोकांना भेट म्हणून देण्याची कौतुकास्पद प्रथा सुरू झाली. यातून शासनालाही चांगला महसूल प्राप्त होत होता. परंतु मागील दोन वर्षांपासून बार्टीची ही योजनाच बारगळली आहे. सवलतीत पुस्तके देणे दूरच राहिले, पुस्तक विक्रीच बंद पडली आहे.

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना रोखण्याचा प्रकार?

तब्बल ८५ टक्के सवलत मिळत असल्याने गावोगावी संविधान जनजागृतीचे कार्यक्रम होऊ लागले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना संविधानाची प्रत भेट देण्यात येऊ लागली. इतकेच नव्हे, तर शासनाचा उद्देशही यातून सफल होत असताना ही योजना बंद करण्याची गरज काय? शाहू - फुले - आंबेडकरांचे विचार रोखण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल लोक करू लागले आहेत. काही संघटनांनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता कोरोना व या योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे कारण सांगितले जात आहे. असे असेल तर चौकशी करा. मात्र, लोकांचा प्रतिसाद मिळत असलेली याोजना बंद करण्याची गरज नाही, असेही संघटनांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र