शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संविधानासह महापुरुषांच्या पुस्तकांवरील सवलतीची योजना बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 11:25 IST

Nagpur News भारतीय संविधान आणि महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत, या उद्देशाने सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या बार्टीतर्फे या पुस्तकांवर ८५ टक्के सवलतीची योजना जाहीर करण्यात आली होती. परंतु ही योजना बारगळली असून, मागील दोन वर्षांपासून पुस्तक विक्रीच बंद पडली आहे.

ठळक मुद्देबार्टीतर्फे दिली जात होती ८५ टक्के सवलतदोन वर्षांपासून पुस्तक विक्रीच नाही

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संविधान आणि महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत, या उद्देशाने सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या बार्टीतर्फे या पुस्तकांवर ८५ टक्के सवलतीची योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु ही योजना बारगळली असून, मागील दोन वर्षांपासून पुस्तक विक्रीच बंद पडली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे साहित्य, तसेच भारतीय संविधानाची प्रत लोकांपर्यंत पोहोचावी, सर्वांनी ती वाचावी, यातून एक आदर्श समाजाची निर्मिती व्हावी, या उद्देशाने बार्टीने ही योजना सुरू केली होती. या योजनेनुसार ग्रंथांच्या मूळ किमतीवर ८५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात हाेती. १०० रुपयांचे पुस्तक १५ रुपयांना मिळत होते. त्यामुळे या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिणामी वाचनप्रेमींची संख्या वाढली. यातून एकमेकांना ग्रंथ भेट देण्याची नवी प्रथाही सुरू झाली होती. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते असोत किंवा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकार लोक असोत कोणत्याही उपक्रमात या मंडळींनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून महामानवाचे पुस्तक किंवा संविधानाची प्रत लोकांना भेट म्हणून देण्याची कौतुकास्पद प्रथा सुरू झाली. यातून शासनालाही चांगला महसूल प्राप्त होत होता. परंतु मागील दोन वर्षांपासून बार्टीची ही योजनाच बारगळली आहे. सवलतीत पुस्तके देणे दूरच राहिले, पुस्तक विक्रीच बंद पडली आहे.

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना रोखण्याचा प्रकार?

तब्बल ८५ टक्के सवलत मिळत असल्याने गावोगावी संविधान जनजागृतीचे कार्यक्रम होऊ लागले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना संविधानाची प्रत भेट देण्यात येऊ लागली. इतकेच नव्हे, तर शासनाचा उद्देशही यातून सफल होत असताना ही योजना बंद करण्याची गरज काय? शाहू - फुले - आंबेडकरांचे विचार रोखण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल लोक करू लागले आहेत. काही संघटनांनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता कोरोना व या योजनेत काही गैरप्रकार झाल्याचे कारण सांगितले जात आहे. असे असेल तर चौकशी करा. मात्र, लोकांचा प्रतिसाद मिळत असलेली याोजना बंद करण्याची गरज नाही, असेही संघटनांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र