शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

साेयाबीन; काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ! पेरणीक्षेत्र हाेत आहे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 22:20 IST

Nagpur News सन २०१४-१५ पासून राेग व किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट व्हायला सुरुवात झाली.

ठळक मुद्देसरासरी उत्पादनात घट राेग, किडींसह परतीच्या पावसाचा फटका

सुनील चरपे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नगदी पिकांमध्ये कपाशीला पर्याय म्हणून साेयाबीनला प्रथम पसंती दर्शविली हाेती. सुरुवातीला उत्पादनाचा कमी काळ व उत्पादनखर्चात अधिक उत्पादन हाेत असल्याने तसेच चांगला बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यात साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र, सन २०१४-१५ पासून राेग व किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट व्हायला सुरुवात झाली. वाढता उत्पादनखर्च व मिळणारा कमी बाजारभाव यामुळे दरवर्षी पदरात ताेटाच पडताे. हल्ली काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील साेयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली आहे. परिणामी, जिल्ह्यातील साेयाबीन पेरणीक्षेत्र कमी हाेत आहे. (Sayabeen; Sow any variety, loss is inevitable! Sowing area is low)

साेयाबीन हे सरळ वाण असल्याने यात हायब्रीड वाण उपलब्ध नाही. अलीकडे शेतकरी साेयाबीनचे कमी काळात येणारे (अर्ली व्हेरायटी-८५ ते ९० दिवस), मध्यम काळात येणारे (मीडियम व्हेरायटी-९० ते १०० दिवस) व उशिरा येणारे (लेट व्हेरायटी-१०५ ते १२० दिवस) वाण पेरणीसाठी वापरतात. यात अर्ली व मीडियम व्हेरायटीला अधिक प्राधान्य दिले जात असले तरी या दाेन्ही व्हेरायटी राेग व किडींना माेठ्या प्रमाणात बळी पडतात. लेट व्हेरायटीचे साेयाबीन तुलनेत राेग व किडींना कमी बळी पडत असले तरी कापणीच्या काळात परतीचा पाऊस येत असल्याने नुकसान हाेते.

जेएस-७१०५ (लेट व्हेरायटी) याच वाणापासून साेयाबीनच्या तिन्ही व्हेरायटींमधील विविध वाण विकसित करण्यात आले आहे. हे सर्व वाण संशाेधित म्हणून ओळखले जातात. यात जेएस-३३५, जेएस-९३०५, जेएस-९७५२, जेएस-९५६०, एमएयूएस-७१, एमएयूएस-८१, एमएयूएस-७०, एमएयूएस-८१, एमएयूएस-१५८, एमएयूएस-४७, एमएयूएस-४७, एमएयूएस-६१, एमएयूएस-६१२, डीएस-२२८ (फुले कल्याणी), केडीएस-३४४ (फुले अग्रणी), एमएसीएस-५, एमएसीएस-४५०, एमएसीएस-१३, एमएसीएस-१२४, एमएसीएस-११८८, एनसीआर-३७, टीएएमएस-९८२१ या वाणांचा समावेश आहे.

कमी काळात येणारे सोयाबीन

कमी काळात (८५ ते ९० दिवस) येणाऱ्या साेयाबीनच्या वाणाला शेतकरी प्रथम पसंती दर्शवितात. या वाणाच्या साेयाबीन पिकावर माेठ्या प्रमाणात खाेडमाशी, चक्रीभुंगा यासह इतर किडींचा तसेच येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने या वाणाचा उत्पादनखर्च वाढत आहे. राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मध्यम काळात येणारे सोयाबीन

मध्यम काळात (९० ते १०० दिवस) येणारे वाण कमी काळात येणाऱ्या वाणाच्या तुलनेत थाेडे चांगले आहे. या वाणाला किडी व राेगाचा प्रादुर्भाव कमी हाेताे. मात्र, या वाणाच्या साेयाबीनला पीक कापणीच्या काळात परतीच्या पावसाचा धाेका उद्भवण्याची शक्यता असते. रबी पिकासाठी शेत तयार करण्याच्या दृष्टीने हे दाेन्ही चांगले असल्याची माहिती साेयाबीन उत्पादकांनी दिली.

अधिक काळात येणारे सोयाबीन

अधिक काळात (१०५ ते १२०) येणाऱ्या वाणाच्या साेयाबीनवर किडी व राेगाचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव हाेत असला तरी पीक कापणीच्या काळात या वाणाला परतीच्या पावसाचा सर्वाधिक धाेका असताे. शिवाय, या वाणामुळे रबीच्या पिकांसाठी शेत तयार करायला कमी काळ मिळत असल्याने रबी पिकांची पेरणी लांबते. त्यामुळे या वाणाचा वापर बराच कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेती