शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, यंदा धानाचे पीक उत्तम! कृषी विभागाचा जावईशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:24 IST

राहुल पेटकर । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संपूर्ण रामटेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याअभावी धानाचे उभे ...

ठळक मुद्देसर्वेक्षणाचे आदेश नसल्याची माहिती

राहुल पेटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण रामटेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याअभावी धानाचे उभे पीक सुकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुसेवाडी व महादुला परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयावर मोर्चा नेत अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. दुसरीकडे, तालुक्यातील धानाचे पीक उत्तम असल्याचा जावईशोध कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून लावला. शिवाय, आपल्याला शासनाने सर्वेक्षण करण्याचे अद्याप आदेश दिले नाही, असे सांगून हात वर केले.रामटेक तालुक्यातील महादुला, शिवनी, भंडारबोडी, मुसेवाडी, उमरी, चिचदा, सोनेघाट, पंचाळा (बु), मांद्री, देवलापार, हिवराबाजार, मनसर, काचूरवाही, नगरधन भागात यावर्षी अल्प पावसाची नोंद झाली. शिवाय, परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. या धानाच्या पिकाला लोंब्यांवर असताना कालव्याचे पाणी मिळू शकले नाही.शिवाय, तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे ओलिताचे हक्काचे साधन (विहिरी व मोटरपंप) नाही. परिणामी, वाढते तापमान व प्रतिकूल वातावरणामुळे धानाचे पीक सुकायला सुरुवात झाली.या संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, तालुक्यातील देवलापार परिसरातील दोन - तीन गावे वगळता कुठेही धानाच्या पिकाचे नुकसान नाही. धानाचे पीक उत्तम असून, परतीचा पाऊस न बरसल्याने तालुक्यात काही ठिकाणी धानाचे थोडेफार नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, तालुक्यात नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. काम आटोपल्यानंतर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल. यावर्षी धानउत्पादकांचे नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. दुसरीकडे, तालुक्यात कुठेही सर्वेक्षण करण्यात आले नाही, अशी माहिती विविध भागातील शेतकऱ्यांनी दिली.तालुक्यात दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावे आणि शासनाने नुकसानभरपाई जाहीर करून योग्य उपाययोजना कराव्या, यासाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदने दिली. परंतु, शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही. या गंभीर समस्येवर तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते ‘अर्थ’पूर्ण राजकारणात मग्न आहेत.

शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावरधानाचे पीक सर्वात खर्चिक असून, त्याचा उत्पादनखर्च कमीतकमी एकरी २५ हजार रुपये आहे. विविध शासकीय नियम व बंधनांमुळे शेती आधीच तोट्यात आहे. त्यातच यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, उत्पदनात प्रचंड घट येणार असल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर कर्ज व उसणवारीची परतफेड करायची कशी, वर्षभराचा शेती व घरखर्च भागवायचा कसा, मुलांचे शिक्षण व आजारपण यासाठी लागणारा पैसा उभा करायचा कसा अशी मूलभूत चिंता आता भेडसावत असून, शासनाने मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

टॅग्स :agricultureशेती