शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या विचारांनीच देशाचा विकास शक्य

By admin | Updated: June 6, 2014 00:58 IST

मी तटस्थपणे अनेक महापुरुषांचे चरित्र वाचले. ही माणसे खरेच खूप मोठी होती पण त्यांचे काम मला सार्वत्रिक वाटले नाही. त्यांनी केलेले काम मोठे होते पण ते तत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी

अभिनेता शरद पोंक्षे : कलादालन फाऊंडेशन व हेल्पिंग पीपलचा उपक्रम नागपूर : मी तटस्थपणे अनेक महापुरुषांचे चरित्र वाचले. ही माणसे खरेच खूप मोठी होती पण त्यांचे काम मला सार्वत्रिक वाटले नाही. त्यांनी केलेले  काम मोठे होते पण ते तत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केले होते. या महापुरुषांचे चरित्र समजून घेताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या  विचारांनी मात्र मनावर गारुड निर्माण केले. सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनावर त्यांच्या विचारांचे गारुड निर्माण होणे  स्वाभाविक आहे. कारण त्यांचे विचार आजचे, आताचे आणि २0१४ चे वाटतात. सावरकरांच्या विचारांवर आपण अमल केला नाही, त्याचे  दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. सावरकरांच्या विचारांनीच आजही देशाचा विकास शक्य असल्याचे ठाम मत अभिनेता शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. कलादालन फाऊंडेशन आणि हेल्पिंग पीपलच्यावतीने स्वा. सावरकर दर्शन या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी  शरद पोंक्षे बोलत होते. पोंक्षे म्हणाले, आपल्या शालेय अभ्यासक्रमात योग्य इतिहासच शिकवला जात नाही. मुलांच्या अभ्यासक्रमात आपल्या  क्रांतिकारकांच्या जाज्वल्य देशप्रेमाने भारलेला इतिहासच नाही. त्यांना आपण फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती तसेच दुसर्‍या महायुद्धाची  कारणे शिकवितो. त्यामुळे सारा घोळ निर्माण झाला आहे. या देशासाठी लढलेल्या क्रांतिकारकांचा विचार समजवून सांगितल्या जात नसल्यामुळे या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत नाही. आपण  स्वतंत्र देशात जन्माला आलो पण या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी काय किंमत मोजली, याची जाणीवच आम्हाला नसल्याने आम्ही रसातळाला  जातो आहोत. पण यंदा प्रथमच  भारतीय जनतेचे डोळे उघडल्याचा आनंद वाटतो, असे ते म्हणाले. सावरकरांचा विचार या देशाला ५0 वर्षांंंंनी पटला.  सावरकरांनाही हेच वाटत होते. एका ब्रिटिश अधिकार्‍याने सावरकरांना म्हटले, तुम्ही चुकीच्या देशात चुकीच्या वेळी जन्माला आलात. अन्यथा  लोकांनी तुमच्या विचारांवर अमल केला असता. इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम करण्यासाठी मेकॉलेला शिक्षणपद्धती तयार करायला लावली. यामुळे भारतीय संस्कृतीवरच आघात करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आपल्या संस्कृतीचे संचित असलेल्या संस्कृत भाषेचा प्रवाह त्यांनी  थांबविला. याविरोधात सावरकरांनी मोठे कार्य केले. याप्रसंगी मनीष गायकवाड, शेखर रोकडे, माधवी पांडे, श्रद्धा घरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.  (प्रतिनिधी)