शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी आवश्यक - कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई

By आनंद डेकाटे | Updated: February 10, 2024 17:28 IST

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे साधन आहे. तसेच संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी करणे गरजेचे आहे, प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई यांनी येथे केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वारंगा येथील शैक्षणिक परिसरात आयोजित द्वितीय दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ हे प्रमुख अतिथी होते. तर या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. नितीन सांबरे, न्या. अतुल एस. चांदूरकर, आणि न्यायमूर्ती अनिल किलोर हे प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू न्या. गवई म्हणाले, नवीन पिढीतील तरुण वकीलांनी विविध कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षेत्र अजून विकसित केले आहे. विधी क्षेत्र हे विविध आव्हानांनी अंतर्भूत असून विद्यार्थ्यांनी या आव्हानाचा मजबुतीने सामना करावा. प्रखर इच्छाशक्ती, खडतर मेहनत, सातत्य हे गुण जपूनच विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्र आणि विधी सेवा अजून सुलभ आणि सर्वांना उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले, संविधानाची आणि न्यायाची मूल्ये जपूनच आपल्याला न्यायदानाची कार्य करावी लागणार आहे. दीक्षांत समारंभ झाल्यावर विद्यार्थी वर्गाची खरी व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली असून विधी क्षेत्रात पण त्याच उत्साह उमेदीने कार्य करावे. मुट कोर्ट हे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देत असून यांचा फायदा हे भविष्यात नक्कीच होईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी पटकावली सर्वाधिक पदके

समारंभात एकूण ६ आचार्य पदवी प्रमाणपत्र , ३७ पदव्युत्तर प्रमाणपत्र, १०५ पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच २१ गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक प्राप्त केले.

टॅग्स :nagpurनागपूर