शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी आवश्यक - कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई

By आनंद डेकाटे | Updated: February 10, 2024 17:28 IST

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे साधन आहे. तसेच संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी करणे गरजेचे आहे, प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई यांनी येथे केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वारंगा येथील शैक्षणिक परिसरात आयोजित द्वितीय दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ हे प्रमुख अतिथी होते. तर या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. नितीन सांबरे, न्या. अतुल एस. चांदूरकर, आणि न्यायमूर्ती अनिल किलोर हे प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू न्या. गवई म्हणाले, नवीन पिढीतील तरुण वकीलांनी विविध कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षेत्र अजून विकसित केले आहे. विधी क्षेत्र हे विविध आव्हानांनी अंतर्भूत असून विद्यार्थ्यांनी या आव्हानाचा मजबुतीने सामना करावा. प्रखर इच्छाशक्ती, खडतर मेहनत, सातत्य हे गुण जपूनच विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्र आणि विधी सेवा अजून सुलभ आणि सर्वांना उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले, संविधानाची आणि न्यायाची मूल्ये जपूनच आपल्याला न्यायदानाची कार्य करावी लागणार आहे. दीक्षांत समारंभ झाल्यावर विद्यार्थी वर्गाची खरी व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली असून विधी क्षेत्रात पण त्याच उत्साह उमेदीने कार्य करावे. मुट कोर्ट हे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देत असून यांचा फायदा हे भविष्यात नक्कीच होईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी पटकावली सर्वाधिक पदके

समारंभात एकूण ६ आचार्य पदवी प्रमाणपत्र , ३७ पदव्युत्तर प्रमाणपत्र, १०५ पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच २१ गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक प्राप्त केले.

टॅग्स :nagpurनागपूर