शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी आवश्यक - कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई

By आनंद डेकाटे | Updated: February 10, 2024 17:28 IST

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे वकिली हा नुसता एक व्यवसाय नसून ते सामाजिक बदल घडवून आणणारे साधन आहे. तसेच संविधानाची मूल्ये जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी करणे गरजेचे आहे, प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई यांनी येथे केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वारंगा येथील शैक्षणिक परिसरात आयोजित द्वितीय दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ हे प्रमुख अतिथी होते. तर या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू व माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. नितीन सांबरे, न्या. अतुल एस. चांदूरकर, आणि न्यायमूर्ती अनिल किलोर हे प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू न्या. गवई म्हणाले, नवीन पिढीतील तरुण वकीलांनी विविध कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हे क्षेत्र अजून विकसित केले आहे. विधी क्षेत्र हे विविध आव्हानांनी अंतर्भूत असून विद्यार्थ्यांनी या आव्हानाचा मजबुतीने सामना करावा. प्रखर इच्छाशक्ती, खडतर मेहनत, सातत्य हे गुण जपूनच विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्र आणि विधी सेवा अजून सुलभ आणि सर्वांना उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले, संविधानाची आणि न्यायाची मूल्ये जपूनच आपल्याला न्यायदानाची कार्य करावी लागणार आहे. दीक्षांत समारंभ झाल्यावर विद्यार्थी वर्गाची खरी व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली असून विधी क्षेत्रात पण त्याच उत्साह उमेदीने कार्य करावे. मुट कोर्ट हे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून देत असून यांचा फायदा हे भविष्यात नक्कीच होईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी पटकावली सर्वाधिक पदके

समारंभात एकूण ६ आचार्य पदवी प्रमाणपत्र , ३७ पदव्युत्तर प्रमाणपत्र, १०५ पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच २१ गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. श्रेया त्रिपाठी आणि सहस्त्रश्रील उमापांडे यांनी सर्वाधिक सुवर्ण पदक प्राप्त केले.

टॅग्स :nagpurनागपूर