शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 10:06 PM

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव वाढणारहरभरा उत्पादनाला फटका

नागपूर: गुलाबी थंडीत दोन दिवसाच्या अंतराने तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. शिवाय मागील आठवडा ढगाळ वातावरण आणि धुक्याचाच राहिला. वातावरणाच्या बदलाचा विपरित परिणाम जवळपास सर्वच पिकांवर झाला असून, यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उमरेड तालुक्यात हरभरा पिकाच्या पेरणीचे क्षेत्र १५,२२२ हेक्टर आहे. गहू ३,२१४ हेक्टर, भाजीपाला ३७३ हेक्टर, सोयाबीन १५० हेक्टर तर फुलपिके ३४ हेक्टर या आणि इतर पिकांसह एकूण १९,३०८ हेक्टरमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. तालुक्यात साधारणत: १० नोव्हेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची हरभरा पेरणी आटोपली. त्या शेतात आता हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत पाेहोचले आहेत.

१५ नोव्हेंबरनंतर पेरणी करणाऱ्या काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा फुलोरा आणि घाटे पकडण्याच्या अवस्थेत आहेत. उमरेड तालुक्यात १०, १२ आणि १४ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोबतच सततच्या धुक्यामुळे आणि खराब हवामानामुळे हरभरा पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ६.३०च्या सुमारास विजांच्या कडकटाडासह पावसाला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे शेतातून पाण्याचे लोट गेले. काही ठिकाणी पाणी साचले. अनेकांच्या शेतामधील गहू, भाजीपाला पिकांनाही खराब वातावरणाचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सोयाबीन उत्पादकांसाठी अवकाळी पाऊस मदतीला धावून आला आहे.

किडींचा अटॅक

वारंवार होणाऱ्या सततच्या अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यावर असलेला हरभरा करपण्याचीही अधिकांश संभावना व्यक्त होत आहे. घाटे अवस्थेत असलेल्या पिकांनाही फटका सोसावा लागेल. शिवाय येत्या काही दिवसात अळी अधिक जोर मारेल. मर रोगाचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हिवाळा की पावसाळा?

उमरेड तालुक्यात १० जानेवारी रोजी ७.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसानंतर १४ जानेवारीला ४.११ तर पुन्हा दोन दिवसानंतर शुक्रवारी पाऊस दोन-अडीच तास पाऊस झाला. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की, पावसाळा संपायचा आहे, असाही अनुभव सर्वांनाच येत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९४१.४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती