शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

रामटेक व हिंगणामध्ये सांगली पॅटर्न ? अपक्ष लढण्याची तयारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

By गणेश हुड | Updated: October 28, 2024 20:40 IST

रामटेक मतदार संघ काँग्रेसला मिळावा, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अदृश्य शक्तीने घात केला.

नागपूर : रामटेक मतदार संघ काँग्रेसला मिळावा, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र अदृश्य शक्तीने घात केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीणमधील सर्व सहा मतदार संघात मोर्चेबांधणी केली होती. परिणामी लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठी लीड मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीत हिंगणा व रामटेक काँग्रेसला मिळावे, असा आग्रह होता. परंतु दोन्ही जागा काँग्रेसला मिळालेल्या नाही.  सोमवारी माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या  बैठकीत  रामटेक व हिंगणा अपक्ष लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी सांगली पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. 

 यावेळी  खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी आमदार विजय घोडमारे,  माजी अध्यक्षा रश्मी बर्वे,  जि.प.सदस्या उज्ज्वला बोढारे, वृंदा नागपुरे,  संजय जगताप, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, उपसभापती प्रकाश नागपुरे, श्याम मंडपे, पंचायत समिती सभापती मनोहरे यांच्यासह हिंगणा मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.  रामटेक विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केले. परंतु यश मिळाले नाही. हिंगणा मतदार संघासाठीही आम्ही आग्रही होतो. परंतु महाविकास आघाडीत काँग्रेसला उमेदवारी मिळालेली नाही. 

 सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर  रामटेक व  हिंगणा मतदारसंघात तयारी केली होती. परंतु दोन्ही ठिकाणी उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तिकीट वाटपात झालेल्या अन्यायावर बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

गेली पाच वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक असा वा ग्रामपंचात निवडणुकीत याचे चांगले परिणाम मिळाले.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या  उमेदवारासाठी पदधिकारी व  कायर्कत्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे  महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडणून आला. आता  विधानसभा निवडणुकीची तयारी  केली आहे. परंतु आघाडीत काँग्रेस उमेदवाराला उमेदवाराला उमेदवारी मिळालेली नाही. यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. हिंगण्यातून दोन अर्ज दाखल करणार

बैठकीतील निर्णयानुसार  हिंगणा विधानसभा मतदार संघातून मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्ज्वला बोढारे व वृंदा नागपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यातील एक उमेदवारी अर्ज कायम ठेवला जाईल. याबाबतचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे.