शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भाजपाच्या ‘मिशन-बिहार’ला संघाचे बळ; प्रचारात स्वयंसेवक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 07:28 IST

Bihar Election RSS Nagpur News मागील वेळचा अनुभव व राष्ट्रीय राजकारणात या निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील यंदा कंबर कसली आहे.

ठळक मुद्देगेल्या वेळी ठेचाळल्याने जागृत झाले ‘संघ’भान

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : बिहार विधानसभा निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. मागील वेळी सरसंघचालकांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यामुळे संघाने फारशी सक्रिय भूमिका घेतली नव्हती. मात्र मागील वेळचा अनुभव व राष्ट्रीय राजकारणात या निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील यंदा कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांतदेखील संघाचे स्वयंसेवक उतरले असून प्रत्यक्ष भाजपचे नाव न घेता प्रचार करण्यात येत आहे. विशेषत: नवे मतदार व मतदानाची टक्केवारी वाढावी यावर जास्त भर देण्यात येत असल्याची माहिती संघाच्या सूत्रांनी दिली आहे.

निवडणुका जाहीर होण्याअगोदरपासूनच संघ स्वयंसेवकांचे काम सुरू झाले होते. ‘ऑनलाईन’ माध्यमावर मतदानवाढीचे आवाहन तर करण्यात येत आहेच. शिवाय गृहसंपर्कादरम्यान प्रत्यक्ष भाजपाचे नाव घेण्यात येत नसले तरी कुठल्या पक्षाला मतदान करावे याचे संकेत देत संघ स्वयंसेवक जनतेमध्ये जात आहेत. बिहारच्या प्रगतीसाठी चांगल्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, तसेच मतदान करणे किती आवश्यक आहे व एका मतामुळे काय फरक पडू शकतो इत्यादी मुद्यांवर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला संबंधित कुटुंब, मोहल्ला पातळीवर पोहोचविणे सुरू झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय, स्थानिक मुद्यांचे दाखलेदेखील दिले जात आहेत, अशी माहिती बिहारमध्ये प्रचारयंत्रणेत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला दिली. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरुण कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मतदारसंघनिहाय चमूंवर जबाबदारी

मतदारसंघनिहाय संघ स्वयंसेवकांच्या चमूंचे नियोजन करण्यात आले आहे. प्रचारादरम्यान कुठेही भाजप किंवा उमेदवाराचे नाव घ्यायचे नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील चमू तयार करण्यात आल्या असून मतदानवाढीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत.

२०१५ मध्ये बसला होता फटका

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात संघ परिवारातील सदस्य सक्रिय होते. मात्र २०१५ मध्ये बिहार निवडणुकांपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी त्याच मुद्याला प्रचाराचा केंद्रबिंदू केले होते. त्यामुळे त्यावेळी स्वयंसेवक प्रचारात सक्रिय नव्हते.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ