शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गामुळे उद्योगधंद्यांची वाढ होणार; शेतकऱ्यांनाही फायदा होणार- चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2022 18:00 IST

या भागात उद्योगधंद्यांची वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ११ डिसेंबर रोजी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकांनीही मोदीजींचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, मोदीजींच्या हस्ते नागपूर शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे नागपूर शहराला विकासकामांचा मोठा लाभ झाला आहे. नागपूर शहरात त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वतः तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक आहोत. जनतेनेही मोदीजींचे उत्स्फूर्त स्वागत करावे, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळेंनी केले.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम नागपूर येथे होईल. याखेरीज नागपूर ते शिर्डी मार्गावर आठ ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पाहतील. त्या त्या ठिकाणी भाजपाचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागात उद्योगधंद्यांची वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन या महामार्गाचा आराखडा करून घेतला आणि कामाला सुरुवात केली. त्यांच्यामुळे महामार्गाचे काम झाले. महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी एकनाथ शिंदे संबंधित खात्याचे मंत्री होते. त्यांनी या कामासाठी पूर्ण वेळ दिला. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महामार्गाच्या उरलेल्या बाबी पूर्ण करतानाच तो गोंदियापर्यंत पुढे नेण्याचे जाहीर केले आहे. आपण त्यांचेही आभार मानतो, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे