शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

समता मार्चने आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:06 IST

अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन  केले जाणार आहे.

ठळक मुद्देदेशभरातील स्त्रीवादी लेखिका सहभागी : शनिवारी उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिलासाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन  केले जाणार आहे.‘आयदान’कार लेखिका ऊर्मिला पवार या संमेलनाच्या अध्यक्ष असून सार्कच्या पदाधिकारी नूर जहीर या उद््घाटक म्हणून लाभल्या आहेत. कुसुमताई तामगाडगे या स्वागताध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून घडलेल्या स्त्री लेखिकांच्या, कवयित्रींच्या, नाट्यलेखिकांच्या चिंतनाला नवा उजाळा आणि नवसाहित्यिकांना दिशा देण्याचे काम या संमेलनातून होणार आहे. जपानच्या डॉ. मिकी इनोकी, अमेरिकेच्या डॉ. वृंदा साखरकर, कर्नाटकच्या बामा याही या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. शनिवारी संविधान चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर पल्लवी वाहाने यांच्या नेतृत्वातील ग्रुपने ‘संविधानाची जाणीव’ हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर समता मार्चला सुरुवात करण्यात आली. ऊर्मिला पवार व नूर जहीर यांच्यासह पश्चिम बंगालच्या कल्याणी ठाकूर, झारखंडच्या प्रसिद्ध कवयित्री निर्मला पुतुल, दिल्लीच्या डॉ. रजनी दिसोडिया, हेमलता, महामंडळाचे प्रा. सतेश्वर मोरे, राज्याच्या विविध भागातून आलेल्या लेखिका, कवयित्री व समीक्षक मार्चमध्ये सहभागी होत्या. महाराजबाग ते रामदासपेठ या मार्गाने होत हा समता मार्च दीक्षाभूमीवर पोहचला. येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देत समता मार्चचा समारोप झाला. आयोजनातील संबुद्ध महिला संघाच्या छायाताई खोब्रागडे, जलदा ढोके, हंसा नारनवरे, विशाखा कांबळे, सुगंधा खांडेकर, सुरेखा लोकरे, सुषमा कळमकर, पुष्पा घोडके आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.शनिवारी दीक्षाभूमीच्या सभागृहात सकाळी १० वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन  होणार आहे. यानंतर विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, विधान चर्चा व काव्यसंमेलन अशा विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन होईल.

टॅग्स :Womenमहिलाliteratureसाहित्य