शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

स्वार्थाने भरलेल्या युगात, कुलींच्या समर्पणभावाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:52 IST

स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.

ठळक मुद्देअडचणीतील प्रवाशांना देतात विनाशुल्क सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वार्थाने भरलेल्या युगात प्रत्येकजण आपला स्वार्थ साधण्यासाठी धडपडतो. पैसा कमविण्यासाठी तर माणूस माणुसकी सोडून कोणत्याही मार्गाचा अवलंब करत आहे. परंतु या स्वार्थापासून रेल्वेस्थानकावरील कुली कोसो दूर आहेत. आजपर्यंतच्या घटनात वेळोवेळी त्यांनी हे सिद्धही केले. अनेकदा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांचे सामान मोफत त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचवून कुलींनी आपला समर्पणभाव दाखवून दिला आहे.अडचणीतील प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वेस्थानकावरील कुली तत्पर असतात. मागील महिनाभरात घडलेल्या दोन घटनांनी कुलींचा सेवाभाव समोर आला. ७ जूनला पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसच्या ए-१ कोचच्या एसीमध्ये बिघाड झाला. एसी दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रवाशांनी बडनेरा, वर्धा स्थानकावर गोंधळ घातला. प्रवासी गोंधळ घालत असल्याची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला समजताच येथील अधिकाऱ्यांनी ए-१ कोच तयार ठेवला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच प्रशासनाने नादुरुस्त झालेला ए-१ कोच तातडीने बदलून नवा कोच गाडीला जोडला. गाडीला विलंब होऊ नये म्हणून अधिकाºयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या नेतृत्वाखाली सुशील अवतार, सोनु गायकवाड, लखन लाल सैनी, नौशाद खान, नफीस अहमद, छोटे खान, अमर सिंह जोगी, नितीन बारामती आदी कुलींनी नि:शुल्क सेवा देत एक रुपयाही न घेता सर्व प्रवाशांचे सामान नव्या कोचमध्ये पोहोचविले. कुलींच्या सेवेबद्दल प्रवाशांनीही त्यांना मनापासून धन्यवाद दिले. ही एकच घटना नव्हे तर १५ दिवसांपूूर्वी गोरखपूर-यशवंतपूर गाडीचे चाक तुटल्यानंतर ही गाडी सोनखांब-कोहळी स्थानकादरम्यान तब्बल ५ तास जागेवरच उभी होती. या गाडीचे चाक तुटलेल्या कोचमधील प्रवाशांचे सामानही कुलींनी विनाशुल्क हलविण्यास मदत केली होती. याशिवाय रेल्वेस्थानकावर असंख्य वेळा अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदत करण्याचे काम रेल्वेस्थानकावरील कुली करत राहतात. पैशासाठी एकमेकांचा गळा कापण्याच्या युगात कुलींचा हा सेवाभाव समाजाला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.११ लाखाचे दागिने केले होते परतदोन वर्षापूर्वी रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केटकडील कडील भागात एक महिला आपली बॅग पोलीस बुथजवळ विसरली.बराच वेळ होऊन सुटकेसजवळ कोणीच येत नसल्याचे पाहून कुली अब्दुल मजीद यांनी ती सुटकेस आपल्या ताब्यात घेतली. बॅगमध्ये वाजत असलेला मोबाईल उचलून संबंधीत महिलेला बॅग आपल्याजवळ असल्याचे सांगितले. ती महिला आल्यानंतर त्या बॅगमध्ये ११ लाखाचे दागिने असल्याचे समजले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरEmployeeकर्मचारी