शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात प्रतिबंधित बियाण्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 11:06 IST

भिवापूर तालुक्यात ‘आरआर व्हीजी-३’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. वास्तवात, या बियाण्याच्या उत्पादन किंवा विक्रीला राज्य किंवा केंद्र सरकारची कोणतीही परवानगी नाही.

ठळक मुद्दे‘आरआर व्हीजी - ३’ नावाने ओळखतणप्रतिबंधक असल्याने प्रथम पसंती

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिवापूर तालुक्यात ‘आरआर व्हीजी-३’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. हे बियाणे तणप्रतिबंधक असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून, त्याला प्रथम पसंती असल्याचेही अनेकांनी सांगितले. वास्तवात, या बियाण्याच्या उत्पादन किंवा विक्रीला राज्य किंवा केंद्र सरकारची कोणतीही परवानगी नाही. कृषी विभागालाही हे बियाणे पकडण्यात यश आले नाही.केंद्र शासनाने कपाशीच्या ‘बीटी’ वाणावर बंदी घातली आहे. कपाशीचे जेही वाण ‘बीटी’ नावाने बाजारात उपलब्ध आहे, त्यावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने एकीकडे कापसाचा उत्पादनखर्च वाढला तर दुसरीकडे उत्पानातही मोठी घट झाली. नेमका याच परिस्थितीचा फायदा घेत काही बोगस बियाणे उत्पादन कंपन्यांनी छुप्या पद्धतीने जाहिराती करून ‘आरआर व्हीजी - ३’ व तत्सम वाण चोरून लपून विकायला सुरुवात केली.यातील काही वाणांचे चांगले उत्पादन झाल्याने तसेच ते वाण तणप्रतिबंधक असल्याने निंदणाच्या खर्चात बचत झाली. त्यामुळे ते बियाणे प्रतिबंधित का असेना पण शेतकऱ्यांनी त्या वाणाला प्रथम पसंती दिली. दुसरीकडे ‘आरआर व्हीजी - ३’ वाणामुळे काही शेतकऱ्यांनी फसगत झाल्याचा अनुभवही अनेकांना मागील वर्षी आल्याचे काहींनी सांगितले. हा प्रकार शासनाच्या कृषी विभागाला माहिती आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सदर बियाणे पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण, त्यांना भिवापूर तालुक्यात एखादे पॅकेटही जप्त करण्यात अद्याप यश आले नाही. हे बियाणे कोणत्याही कृषी सेवा केंद्रात विकत मिळत नाही. तरीही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाते. यावरून या बियाणे विक्रेत्यांचे ‘नेटवर्क’ किती जबरदस्त आहे, हेही स्पष्ट होते.

जाचक नियम शेती क्षेत्रावरच का?राज्य शासनाने बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक विक्रीसंदर्भात पूर्वीपेक्षा अधिक कठोर नियम केले आहे. त्या नियमांच्या अनुषंगाने बियाणे उत्पादक ५२ विविध कंपन्यांच्या कपाशीच्या वाणाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दुसरीकडे, ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांच्या विक्रीला परवानगी दिली आहे. या जाचक नियामांच्या चाकोरीत काम करताना कृषी सेवा केंद्र संचालकांच्या नाकीनऊ आले आहे. असले जाचक नियम सरकार शेती क्षेत्रावरच का लावते, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

‘बोलगार्ड’वर गुलाबी बोंडअळीकेंद्र शासनाने कपाशीच्या ‘बीटी’ वाणावर बंदी घातली आहे. सध्या बाजारात असलेले ‘बीटी - २’ हे वाण कालबाह्य झाले असून, ते बोंडअळी प्रतिबंधक राहिले नाही. तरीही ते ‘बोलगार्ड’ नावाचा वापर करून बाजारात विकले जात असून, शासनाने त्याला रीतसर परवानगी दिली आहे. वास्तवात, हे ‘बोलगार्ड’ वाण गुलाबी बोंडअळीला बळी पडत असून, त्या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना बराच खर्च करावा लागतो. त्यातून कापसाचा उत्पादनखर्च वाढत असून, उत्पादनात घट येते. सोबतच सरकार कापसाला भावही देत नाही.

टॅग्स :agricultureशेती