शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट हेल्मेटची विक्री ठरतेय अनेकांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:30 IST

मोटर वाहन कायद्यातील तरतुदीला केराची टोपली दाखवून शहरामध्ये निकृष्ट हेल्मेटस्ची सर्रास विक्री होत आहे.

ठळक मुद्दे कायद्यातील तरतुदीला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोटर वाहन कायद्यातील तरतुदीला केराची टोपली दाखवून शहरामध्ये निकृष्ट हेल्मेटस्ची सर्रास विक्री होत आहे. संबंधित प्रशासन यासंदर्भात मूग गिळून गप्प असून निकृष्ट हेल्मेटस् विकणाऱ्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. तसेच, वाहतूक पोलीसही वाहन चालकाने आयएसआय प्रमाणित हेल्मेट घातले असल्याची शहानिशा करीत नाहीत. परिणामी, वाहन चालक केवळ दंड वाचविण्यासाठी स्वस्त दरात मिळणारे निकृष्ट हेल्मेटस् खरेदी करीत आहेत. अपघात झाल्यास ते हेल्मेटस् वाहन चालकाचे संरक्षण करू शकत नाहीत.मोटर वाहन कायद्यातील कलम १२९ मध्ये हेल्मेटबाबत स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार, दुचाकी चालविणाऱ्याने व दुचाकीवर प्रवास करणाऱ्याने आयएसआय प्रमाणित हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. परंतु, या तरतुदीचे काटेकोर पालन होत नाही. वाहतूक पोलीस केवळ वाहन चालकाने हेल्मेट घातले आहे की नाही एवढीच शहानिशा करतात. ते हेल्मेट कायद्यानुसार आहे काय हे पाहिले जात नाही. आयएसआय प्रमाणित नसलेले हेल्मेट स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे बहुतांश नागरिक निकृष्ट दर्जाचे हेल्मेटस् घालून वाहन चालवित आहेत. परिणामी, कायद्यातील तरतुदीचा उद्देश अयशस्वी ठरत आहे.२००५ मध्ये उच्च न्यायालयाने दुचाकी चालविणाऱ्याला व दुचाकीवर बसणाऱ्याला आयएसआय प्रमाणित हेल्मेट घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले होते. तसेच, हेल्मेट असल्याशिवाय दुचाकीची नोंदणी करायला नको, असे मत व्यक्त केले होते. २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता. असे असले तरी, परिस्थितीत आजही बदल झालेला नाही.

वाहतूक विभागाला पत्रग्राहक न्याय परिषद महाराष्ट्र राज्याचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमित हेडा यांनी नोव्हेंबर-२०१७ मध्ये वाहतूक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून निकृष्ट दर्जाचे हेल्मेटस् विकणाऱ्यांवर व निकृष्ट दर्जाचे हेल्मेटस् वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे सध्याचे चित्र पाहता स्पष्ट होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा