शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

भोसलेकालीन सक्करदरा तलाव बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:06 IST

संरक्षण व सौंदर्यीकरण ठप्प : पायऱ्या खचल्या; तलावालगतचा रस्ता खचण्याचा धोका लोकमत जागर- लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीचे ...

संरक्षण व सौंदर्यीकरण ठप्प : पायऱ्या खचल्या; तलावालगतचा रस्ता खचण्याचा धोका

लोकमत जागर-

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या भोसलेकालीन सक्करदरा तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरणाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. मात्र मागील दीड वर्षापासून काम ठप्प आहे. उद्यानाच्या बाजूच्या तलावाच्या पायऱ्या खचायला लागल्या आहेत. पावसाळ्यात तलावात पाणी साचल्यानंतर छोटा ताजबाग बाजूचा रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेंतर्गत तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरणासाठी २९ जुलै २०१९ रोजी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शासनाकडून निधी प्राप्त झालेला नसला तरी तलावाच्या पूर्वेकडील संरक्षण भिंत कोसळल्याने निर्माण झालेला धोका विचारात घेता स्थायी समितीच्या ठरावानुसार मनपा प्रशासनाने कार्यादेश दिले होते. ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यादेश मिळताच मे. जखापूर जगदंबा कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने कामाला सुरुवात केली. फक्त झोपडपट्टीच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. त्यानंतर काम बंद पंडले. ते अजूनही ठप्प आहे.

तलावातील गाळ काढणे, संरक्षण भिंत उभारणे, तलाव खोलीकरण, उद्यानाच्या बाजूने पायऱ्यांचे बांधकाम, सौंदर्यीकरण अशा कामांचा यात समावेश होता. दोन वर्षात फक्त २५ टक्के काम झाले आहे. दीड वर्षापासून काम ठप्प आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ काढणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदाराने तो काढला नाही.

...

निधीसाठी शासनाला पत्र

सक्करदरा तलावाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. जवळपास २५ टक्के काम झाले. परंतु निधीअभावी काम बंद पडले. शासनाकडून निधी प्राप्त व्हावा, यासाठी नगर विकास विभागाला पत्र पाठविण्यात आले. परंतु त्यानंतरही शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

....

उद्यानाच्या बाजूच्या पायऱ्या खचल्या

नासुप्र उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी तलावाला पायऱ्या बांधल्या आहेत. परंतु गेल्या आठवड्यात पायऱ्या खचल्या. यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साचल्यानंतर या पायऱ्या पुन्हा खचण्याचा धोका आहे.

....

रहदारी बंद पडण्याची शक्यता

छोटा ताजबाग बाजूने तलावाची संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेतले होते. परंतु ते अर्धवट आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साचल्यास या बाजूचा रस्ता खचून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने रस्त्यावर टिनाचे कठडे लावण्यात आले आहे. रस्ता खचल्यास या मार्गावरील वाहतूक ठप्प पडण्याचा धोका आहे.

....

बंद पडलेले काम तत्काळ सुरू करा

तलावाला संरक्षण भिंत उभारण्यापूर्वी तलावातील गाळ काढणे अपेक्षित होते. उन्हाळ्यात तलाव कोरडा पडला होता. परंतु तलावातील गाळ काढला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर गाळ काढणे शक्य होणार नाही. पावसाळ्यात रस्ता खचून अपघात होण्याचा धोका आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाला तत्काळ सुुरुवात करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश होले यांनी केली आहे.