शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना संत चोखामेळा साहित्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 10:51 IST

यंदाचा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार महराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरीवादक, युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांनी रविवारी नागपुरात याची घोषणा केली.

ठळक मुद्देसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्यावतीने सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान करणारे, कीर्तनाच्या, प्रबोधनाच्या व गीतांच्या माध्यमातून समाजात महापुरुषांचे संत महात्म्यांचे विचार पोहचविण्याकरिता प्रबोधन करणाऱ्या कलाकारांना संत चोखामेळा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून संत चोखामेळा यांच्या जयंतीचे औचित्य साधून यंदाचा संत चोखामेळा साहित्य पुरस्कार महराष्ट्रातील ख्यातनाम सप्तखंजेरीवादक, युवा प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय मंत्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार बडोले यांनी रविवारी नागपुरात याची घोषणा केली.तुषार सूर्यवंशी यांनी संपूर्ण महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब इत्यादी राज्यांमध्ये संविधान जनजागृती, ग्राम स्वच्छता अभियान, आदर्श गाव, तंटामुक्ती अभियान, व्यसनमुक्ती, निर्मल ग्राम, शिक्षण, आरोग्य, बालसंस्कार, शासनच्या जनकल्याणकारी योजना, परिवर्तनवादी विचार, नेत्रदान-देहदान-रक्तदान इत्यादी विषयामधून फुले, शाहू, आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत चोखामेळा, संत तुकडोजी महाराज, संत कबीर, अण्णाभाऊ साठे, संत रविदास इत्यादी संत महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून पोहचविण्याचे कार्य केले आहे. तुषार सूर्यवंशी यांनी संपूर्ण भारतात १८०० पेक्षा अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. आतापर्यंत तुषार सूर्यवंशी यांना विदर्भ गौरव पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार, समाजप्रबोधन पुरस्कार, नागपूर भूषण पुरस्कार, युवा कलारत्न पुरस्कार, फुले-शाहू आंबेडकर समता पुरस्कार असे विविध ४५ पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या या प्रबोधनाच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना यंदाचा चोखामेळा पुरस्कार घोषित केला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणाºया कार्यक्रमात प्रदान केले जाईल.

शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधनाचे कार्य सुरू राहील‘आम्ही सप्तखंजेरीच्या माध्यमातून संत महापुरुषांचे विचार, भारतीय संविधान घराघरात पोहोचवण्याचे कार्य करतो. आमच्या या कार्याची शासनाने दखल घेऊन पुरस्कार दिल्यास आमचाही उत्साह वाढतो. शासनाचा पुरस्कार म्हणजे शेवटी लोकांचाच पुरस्कार होय, लोकांच्या या पुरस्काराने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. अधिक जोमाने काम करीत शेवटच्या श्वासापर्यंत संत महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत राहणार’, असे सप्तखंजेरीवादक तुषार सूर्यवंशी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक