शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साहिलने केली होती बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:30 IST

नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांनंतर प्रकरण उघडकीस : नंदनवन ठाण्यात प्रकरणाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेत्यांच्या मदतीने वसुली करणाऱ्या साहिल सय्यदने बनावट कागदपत्रांद्वारे दुसऱ्याच मालकाच्या जमिनीची विक्री केली होती. न्यायालयाने पुन: तपासाचा आदेश दिल्यामुळे १० वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट घेतल्यानंतर नंदनवनपोलिसांकडून साहिलला अटक केली जाणार आहे. साहिलच्या विरोधातील हे सहावे प्रकरण आहे.नंदनवन निवासी अविनाश रारगोडे यांचे वडील श्यामराव यांचे रमणा मारोती येथे दोन हजार चौ.फुटाचे भूखंड होते. या जागेचे वर्तमान मूल्य एक कोटी रुपये इतके आहे. रघुवीर शर्मा नावाच्या व्यक्तीने श्यामराव रारगोडे यांच्या नावाचे बनावट मृत्यूपत्र बनवून हा भूखंड आपल्या नावे केला आणि नंतर साहिलला विकला. ही बाब कळताच अविनाश रारगोडे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपासास सुरुवातही केली. तथाकथित रघुवीर शर्मा याचा कधीच पत्ता लागला नाही. मात्र, पोलिसांकडून साहिलची कधीच विचारपूस झाली नाही. त्यानंतर पोलिसांनी रघुवीर शर्मा सापडत नसल्याचे सांगत न्यायालयाकडे आरोपपत्र पाठविण्यात आले. तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयातच प्रलंबित होते. २०१९ मध्ये अविनाश रारगोडे यांनी न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यासाठी आवेदन केले. याच आधारावर न्यायालयाने नंदनवन पोलिसांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहे.नंदनवन पोलिसांनी केलेल्या तपासात साहिलने हा भूखंड परवेज नावाच्या व्यक्तीला विकल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी औद्योगिक कर्मचारी गृह निर्माण संस्थेची बनवाट एनओसीही घेतली होती. याच आधारावर साहिलला या प्रकरणात आरोपी बनविण्यात आले आहे. न्यायालयाने पुन्हा तपासाचे आदेश दिल्यानंतर आणि नंदनवन पोलीस या प्रकरणात गंभीर झाल्याने साहिलचे कारनामे पुढे यायला लागले आहेत. या प्रकरणात तत्कालीन तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नंदनवन पोलिसांनी आज प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केले असून, गुरुवारी त्याला तुरुंगातून अटक केली जाईल.अ‍ॅलेक्सिस प्रकरणात नीलिमाला अटकसाहिलची पत्नी नीलिमा जायस्वाल ऊर्फ तिवारीलासुद्धा अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटल प्रकरणात तुरुंगातून अटक करण्यात आली आहे. तिला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर ताब्यात घेतले जाईल. या प्रकरणाशी जुळलेल्या लोकांची नजर मनपाच्या अधिकाऱ्यावर खिळली आहे. याच अधिकाऱ्याची या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. कोट्यवधी रुपये उकळण्यासाठीच हा प्रकार घडविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच या प्रकरणात हप्ता वसुलीचा गुन्हाही नोंद केला आहे. अशास्थितीत पोलीस मनपा अधिकाऱ्याबाबत कोणते पाऊल उचलतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी