शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 20:50 IST

सध्याच्या परिस्थितीत आॅटोरिक्षा चालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून स्वत:चा बचाव करण्याचे कोणतेही साधन प्रवाशांकडे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्याची कार्यवाही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : सरकारला दिला सहा महिन्यांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्याच्या परिस्थितीत आॅटोरिक्षा चालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून स्वत:चा बचाव करण्याचे कोणतेही साधन प्रवाशांकडे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्याची कार्यवाही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजीतसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, राज्य सरकारने आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्यासाठी चालढकलपणा केला. परिणामी, आॅटोरिक्षांमध्ये अद्याप जीपीएस लागू शकले नाही. आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्यात विविध अडचणी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु, याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. हरनीश गढिया यांनी सरकारचे मुद्दे खोडून काढले. उबेर व ओला या कंपन्यांच्या अ‍ॅपवरून आॅटोरिक्षा भाड्याने मिळतो. त्या आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावले असते. या खासगी कंपन्या आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावू शकतात तर, सरकारला यात अडचण येण्याचे काहीच कारण नाही असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाला त्यांच्या युक्तिवादात तथ्य आढळूनआले. परिणामी, न्यायालयाने सरकारला वरील आदेश दिला. तसेच, नियमांचे पालन करणे व नियमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे असे मत व्यक्त केले. या प्रकरणावर आता १० एप्रिल २०१९ रोजी पुढील सुनावणी होईल. त्यावेळी सरकारकडून या आदेशावरील अंमलबजावणीची माहिती घेतली जाईल.यावरही अंमलबजावणीचे निर्देशवाहतूक नियम तोडणाऱ्यांचा रेकॉर्ड ठेवण्याकरिता सॉफ्टवेअर विकसित करण्यात यावे आणि ग्रामीण व शहरातील आॅटोरिक्षांच्या छताचा रंग वेगवेगळा ठेवण्यात यावा अशी विनंतीदेखील याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला पुढील तारखेपर्यंत यावरही अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी ‘वाहन ४.०’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर सध्या मुंबई आरटीओ क्षेत्रातच वापरले जात आहे. सॉफ्टवेअर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वारंवार वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणे शक्य होईल. तसेच, सरकारने ग्रामीण व शहरातील आॅटोरिक्षांच्या छताचा रंग वेगवेगळा ठेवण्यासाठी नियमात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. छताचे रंग वेगवेगळे झाल्यास ग्रामीण आॅटोरिक्षांना शहरामध्ये अवैधपणे प्रवेश करता येणार नाही.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयauto rickshawऑटो रिक्षा