शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 20:50 IST

सध्याच्या परिस्थितीत आॅटोरिक्षा चालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून स्वत:चा बचाव करण्याचे कोणतेही साधन प्रवाशांकडे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्याची कार्यवाही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : सरकारला दिला सहा महिन्यांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्याच्या परिस्थितीत आॅटोरिक्षा चालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून स्वत:चा बचाव करण्याचे कोणतेही साधन प्रवाशांकडे नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावणे आवश्यक झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब लक्षात घेता आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्याची कार्यवाही येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमजीतसिंग कलसी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान, राज्य सरकारने आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्यासाठी चालढकलपणा केला. परिणामी, आॅटोरिक्षांमध्ये अद्याप जीपीएस लागू शकले नाही. आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावण्यात विविध अडचणी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु, याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. हरनीश गढिया यांनी सरकारचे मुद्दे खोडून काढले. उबेर व ओला या कंपन्यांच्या अ‍ॅपवरून आॅटोरिक्षा भाड्याने मिळतो. त्या आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावले असते. या खासगी कंपन्या आॅटोरिक्षांमध्ये जीपीएस लावू शकतात तर, सरकारला यात अडचण येण्याचे काहीच कारण नाही असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाला त्यांच्या युक्तिवादात तथ्य आढळूनआले. परिणामी, न्यायालयाने सरकारला वरील आदेश दिला. तसेच, नियमांचे पालन करणे व नियमांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करणे अनिवार्य आहे असे मत व्यक्त केले. या प्रकरणावर आता १० एप्रिल २०१९ रोजी पुढील सुनावणी होईल. त्यावेळी सरकारकडून या आदेशावरील अंमलबजावणीची माहिती घेतली जाईल.यावरही अंमलबजावणीचे निर्देशवाहतूक नियम तोडणाऱ्यांचा रेकॉर्ड ठेवण्याकरिता सॉफ्टवेअर विकसित करण्यात यावे आणि ग्रामीण व शहरातील आॅटोरिक्षांच्या छताचा रंग वेगवेगळा ठेवण्यात यावा अशी विनंतीदेखील याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला पुढील तारखेपर्यंत यावरही अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी ‘वाहन ४.०’ सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर सध्या मुंबई आरटीओ क्षेत्रातच वापरले जात आहे. सॉफ्टवेअर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर वारंवार वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणे शक्य होईल. तसेच, सरकारने ग्रामीण व शहरातील आॅटोरिक्षांच्या छताचा रंग वेगवेगळा ठेवण्यासाठी नियमात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. छताचे रंग वेगवेगळे झाल्यास ग्रामीण आॅटोरिक्षांना शहरामध्ये अवैधपणे प्रवेश करता येणार नाही.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयauto rickshawऑटो रिक्षा