शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरातील अंबाझरी तलावाचा सुरक्षा बांध जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 21:39 IST

Ambazari lake Nagpur News गेली दीडशे वर्षे सतत नागपूरकरांची तहान भागविणारा, आकर्षण व अभिमानाचा विषय असलेला अंबाझरी तलाव आज मात्र संकटावस्थेतून जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेली दीडशे वर्षे सतत नागपूरकरांची तहान भागविणारा, आकर्षण व अभिमानाचा विषय असलेला अंबाझरी तलाव आज मात्र संकटावस्थेतून जात आहे. तलावाचा सुरक्षा बांध जीर्णावस्थेत गेला असून अनेक भागात खंडीत झाला आहे. अतिवृष्टीमुळे जर पाण्याची पातळी वाढली आणि सुरक्षा बांध फुटला तर पश्चिम नागपूरच्या अनेक वस्त्या जलमय होण्याची, जीवित व वित्त हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अंबाझरी तलाव नागपूरच्या ११ मोठा तलावांपैकी एक असून शहराचे वैभव आहे. शहरातून वाहणारी नागनदी या तलावातूनच उगम पावते. यावर्षी सर्वच ठिकाणी चांगला पाउस झाला आणि अशा परिस्थितीत नाग नदीच्या पानलोट क्षेत्रातून पावसाळ््यात पाण्याची आवक झाली तर तलावाला धोका होण्याची शक्यता आहे. अशात तलावाचा सुरक्षा बांध अनेक भागातून खंडीत झाला असून आधीच आयुष्य संपलेल्या तलावाच्या अस्तित्वाचे संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ असलेल्या सांडव्यापासून ते अंबाझरी उद्यानापर्यंत सुरक्षा भिंतीचा अनेक भाग जीर्ण झाला आहे. अनेक वर्षाचे बांधकाम असलेल्या सुरक्षा बांधाची जीर्णावस्था लक्षात घेत चार वर्षापासून तलाव बळकटीकरणाबाबत महापालिक ा व मेट्रोचा प्रस्ताव धुळखात पडला आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही.मेट्रोचे बांधकाम हेही धोक्याचे कारणतलावावर आलेल्या संकटाचे मेट्रो हेही एक कारण आहे. जल अभ्यासक प्रवीण महाजन यांनी, मेट्रो रेल्वेचे १४ पिलर्स अंबाझरी तलावासाठी डोकेदुखी ठरणार तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली आहे. या पीलर्सवर धावणाऱ्या मेट्रोच्या कंपनामुळे अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीला तडे जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. याबाबत अभ्यास झालेत. काही उपाय योजना सूचविण्यात आल्यात. तलावावर मालकी महापालिकेची असली तरी बळकटीकरण व सुशोभिकरणाची जबाबदारी मेट्रो व जलसंपदा विभागाकडे आहे. मात्र चार वर्षात कागदांपलीकडे काहीच पुढे सरकले नाही. मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनने जवळपास पाच ते सहा हजार कोटींची बांधकामे चार वर्षात पूर्ण केली पण १०-२० कोटीचा अंबाझरी तलाव बळकटीकरण व सुशोभिकरण कोणालाही पूर्ण करता आले नाही, हे दुर्दैव असल्याची खंत महाजन यांनी व्यक्त केली.न्यायालयाच्या निर्देशालाही हरताळखासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून तलावांच्या सुरक्षिते विषयी मार्गदर्शन केले. दगडाचे पीचींग, सौंदर्यीकरण, सुशोभीकरण सोबतच बळकटीकरण करून नागपूरकरांना या संकटातून वाचवण्याचे सूचना केल्यात. उल्लेखनीय म्हणजे उच्च न्यायालयाने सुध्दा मार्च २०१८ मध्ये उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र त्या निर्देशांनाही जबाबदार यंत्रणेकडून हरताळ फासण्यात आला.

 

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव