शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

साेयाबीन : काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

सुनील चरपे लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नगदी पिकांमध्ये कपाशीला पर्याय म्हणून साेयाबीनला प्रथम पसंती दर्शविली हाेती. ...

सुनील चरपे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नगदी पिकांमध्ये कपाशीला पर्याय म्हणून साेयाबीनला प्रथम पसंती दर्शविली हाेती. सुरुवातीला उत्पादनाचा कमी काळ व उत्पादनखर्चात अधिक उत्पादन हाेत असल्याने तसेच चांगला बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यात साेयाबीनचा पेरा वाढला हाेता. मात्र, सन २०१४-१५ पासून राेग व किडींचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या उत्पादनात घट व्हायला सुरुवात झाली. वाढता उत्पादनखर्च व मिळणारा कमी बाजारभाव यामुळे दरवर्षी पदरात ताेटाच पडताे. हल्ली काेणतेही वाण पेरा, नुकसान अटळ आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील साेयाबीन उत्पादकांनी व्यक्त केली आहे. परिणामी, जिल्ह्यातील साेयाबीन पेरणीक्षेत्र कमी हाेत आहे.

साेयाबीन हे सरळ वाण असल्याने यात हायब्रीड वाण उपलब्ध नाही. अलीकडे शेतकरी साेयाबीनचे कमी काळात येणारे (अर्ली व्हेरायटी-८५ ते ९० दिवस), मध्यम काळात येणारे (मीडियम व्हेरायटी-९० ते १०० दिवस) व उशिरा येणारे (लेट व्हेरायटी-१०५ ते १२० दिवस) वाण पेरणीसाठी वापरतात. यात अर्ली व मीडियम व्हेरायटीला अधिक प्राधान्य दिले जात असले तरी या दाेन्ही व्हेरायटी राेग व किडींना माेठ्या प्रमाणात बळी पडतात. लेट व्हेरायटीचे साेयाबीन तुलनेत राेग व किडींना कमी बळी पडत असले तरी कापणीच्या काळात परतीचा पाऊस येत असल्याने नुकसान हाेते.

जेएस-७१०५ (लेट व्हेरायटी) याच वाणापासून साेयाबीनच्या तिन्ही व्हेरायटींमधील विविध वाण विकसित करण्यात आले आहे. हे सर्व वाण संशाेधित म्हणून ओळखले जातात. यात जेएस-३३५, जेएस-९३०५, जेएस-९७५२, जेएस-९५६०, एमएयूएस-७१, एमएयूएस-८१, एमएयूएस-७०, एमएयूएस-८१, एमएयूएस-१५८, एमएयूएस-४७, एमएयूएस-४७, एमएयूएस-६१, एमएयूएस-६१२, डीएस-२२८ (फुले कल्याणी), केडीएस-३४४ (फुले अग्रणी), एमएसीएस-५, एमएसीएस-४५०, एमएसीएस-१३, एमएसीएस-१२४, एमएसीएस-११८८, एनसीआर-३७, टीएएमएस-९८२१ या वाणांचा समावेश आहे.

...

कमी काळात येणारे सोयाबीन

कमी काळात (८५ ते ९० दिवस) येणाऱ्या साेयाबीनच्या वाणाला शेतकरी प्रथम पसंती दर्शवितात. या वाणाच्या साेयाबीन पिकावर माेठ्या प्रमाणात खाेडमाशी, चक्रीभुंगा यासह इतर किडींचा तसेच येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने या वाणाचा उत्पादनखर्च वाढत आहे. राेग व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

....

मध्यम काळात येणारे सोयाबीन

मध्यम काळात (९० ते १०० दिवस) येणारे वाण कमी काळात येणाऱ्या वाणाच्या तुलनेत थाेडे चांगले आहे. या वाणाला किडी व राेगाचा प्रादुर्भाव कमी हाेताे. मात्र, या वाणाच्या साेयाबीनला पीक कापणीच्या काळात परतीच्या पावसाचा धाेका उद्भवण्याची शक्यता असते. रबी पिकासाठी शेत तयार करण्याच्या दृष्टीने हे दाेन्ही चांगले असल्याची माहिती साेयाबीन उत्पादकांनी दिली.

...

अधिक काळात येणारे सोयाबीन

अधिक काळात (१०५ ते १२०) येणाऱ्या वाणाच्या साेयाबीनवर किडी व राेगाचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव हाेत असला तरी पीक कापणीच्या काळात या वाणाला परतीच्या पावसाचा सर्वाधिक धाेका असताे. शिवाय, या वाणामुळे रबीच्या पिकांसाठी शेत तयार करायला कमी काळ मिळत असल्याने रबी पिकांची पेरणी लांबते. त्यामुळे या वाणाचा वापर बराच कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

...