शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

सदानंद फुलझेले हे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी

By admin | Updated: October 19, 2015 03:09 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

देवेंद्र फडणवीस : मारवाडी फाऊंडेशनचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदाननागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे सदानंद फुलझेले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पाच लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर आयोजित या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, मारवाडी फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश गांधी व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सदानंद फुलझेले यांना आम्ही लहानपणापासूनच ओळखतो. त्यांनी आपले संपूर्ण जीवन दीक्षाभूमीसाठी समर्पित केले. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय आज विदर्भात प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते, ते केवळ सदानंद फुलझेले यांच्या कर्तृत्वामुळे. त्यांनी गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य दिले. दिवंगत दादासाहेब गवई हे दीक्षाभूमीचा चेहरा होते. तर पाठीमागे संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे सदानंद फुलझेले होत, असेही त्यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनीसुद्धा दिवंगत रा. सू. गवई आणि सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर केलेल कार्य हे जागतिक स्वरूपाचे असल्याचे सांगितले. बनवारीलाल पुरोहित आणि दत्ता मेघे यांनीही यावेळी विचार व्यक्त करीत फुलझेले यांच्या कार्याचा गौरव केला. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दलितेतरही मोठ्या संख्येने कार्यरत होते. डॉ. आंबेडकरांनी सर्वंकष दलित चळवळीची भूमिका मांडली होती. तशी सर्वंकष चळवळ उभी राहण्याची गरज आहे. त्यामुळे आपसातील भांडणही दूर होतील. ही केवळ राजकीय गरज नसून ती सामाजिक भूमिकेसाठी अतिशय महत्त्वाची बाब असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. खा. अजय संचेती यांनी प्रास्ताविक केले. संचालन बाळ कुलकर्णी यांनी केले. अतुल कोटेचा यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)पुरस्काराची रक्कम दीक्षाभूमीला दान सदानंद फुलझेले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. १९५२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढलो आणि एका मताने जिंकलो. त्यामुळे १९५६ मध्ये मला उपमहापौर बनता आले. उपमहापौर असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. ती यशस्वीपणे पार पाडू शकलो. तेव्हापासून दीक्षाभूमीची प्रामाणिकपणे सेवा करीत आहे. या सेवेसाठीच मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्कारापोटी मिळालेली पाच लाख रुपयांची रक्कम मी दीक्षाभूमीला दान करीत असल्याचे फुलझेले यांनी जाहीर केले. जलयुक्त शिवारसाठी ११ लाखांचा धनादेश याप्रसंगी मारवाडी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश गांधी यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक करीत या अभियानासाठी फाऊंडेशनच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ११ लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.