शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

संधी मिळणार नसल्याच्या विचाराने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले दु:खी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 21:16 IST

Nagpur News राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपूर : राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. आपला देश, हा समाज हा दुखी आत्म्यांचा महासागर आहे. जे मंत्री होणार होते ते आता त्यांना संधी मिळणार की नाही या विचाराने दु:खी आहे. कारण एवढी गर्दी झाली आहे. हे इच्छुक अगोदर सूट बूट शिवून तयार होते व आपला क्रमांक कधी येतो याची वाट बघत होते. आता सूट आहे, मात्र त्याचं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रमादरम्यान ते गुरुवारी सायंकाळी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आ.रामदास आंबटकर, मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे, महामंत्री डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात लोक दु:खाच्या महासागरात आहेत. आमदार झाले नाही म्हणून नगरसेवक दु:खी आहेत, मंत्री झाले नाही म्हणून आमदार दु:खी आहेत व चांगले खाते मिळाले नाही म्हणून मंत्री दु:खी असल्याचे दिसून येते. शेवटी जे आहे त्यात समाधान मानणे महत्त्वाचे असते, असे गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांनी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावरदेखील भाष्य केल. राजकारण हे विद्यापीठ व महाविद्यालयांपासून दूर ठेवले पाहिजे. शैक्षणिक कॅम्पसमध्ये पक्षांच्या राजकारणाला थारा देऊ नये. शिक्षक निश्चितच राजकारणात जाऊ शकतात, मात्र शैक्षणिक परिसरांमध्ये त्याला येऊ देऊ नका, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवड व नियुक्ती झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडवाविद्यापीठांमध्ये भविष्यातील आव्हाने व उद्योगक्षेत्राच्या गरजा लक्षात ठेवून अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैतिक व आर्थिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम होतील असे शिक्षण दिले पाहिजे. नागपूर विद्यापीठात शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्रात समन्वय दिसून येत नाही. विद्यार्थीदशेतच कौशल्य देत अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण