शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

संधी मिळणार नसल्याच्या विचाराने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले दु:खी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 21:16 IST

Nagpur News राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपूर : राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. आपला देश, हा समाज हा दुखी आत्म्यांचा महासागर आहे. जे मंत्री होणार होते ते आता त्यांना संधी मिळणार की नाही या विचाराने दु:खी आहे. कारण एवढी गर्दी झाली आहे. हे इच्छुक अगोदर सूट बूट शिवून तयार होते व आपला क्रमांक कधी येतो याची वाट बघत होते. आता सूट आहे, मात्र त्याचं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रमादरम्यान ते गुरुवारी सायंकाळी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आ.रामदास आंबटकर, मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे, महामंत्री डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात लोक दु:खाच्या महासागरात आहेत. आमदार झाले नाही म्हणून नगरसेवक दु:खी आहेत, मंत्री झाले नाही म्हणून आमदार दु:खी आहेत व चांगले खाते मिळाले नाही म्हणून मंत्री दु:खी असल्याचे दिसून येते. शेवटी जे आहे त्यात समाधान मानणे महत्त्वाचे असते, असे गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांनी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावरदेखील भाष्य केल. राजकारण हे विद्यापीठ व महाविद्यालयांपासून दूर ठेवले पाहिजे. शैक्षणिक कॅम्पसमध्ये पक्षांच्या राजकारणाला थारा देऊ नये. शिक्षक निश्चितच राजकारणात जाऊ शकतात, मात्र शैक्षणिक परिसरांमध्ये त्याला येऊ देऊ नका, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवड व नियुक्ती झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडवाविद्यापीठांमध्ये भविष्यातील आव्हाने व उद्योगक्षेत्राच्या गरजा लक्षात ठेवून अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैतिक व आर्थिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम होतील असे शिक्षण दिले पाहिजे. नागपूर विद्यापीठात शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्रात समन्वय दिसून येत नाही. विद्यार्थीदशेतच कौशल्य देत अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण