शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

संधी मिळणार नसल्याच्या विचाराने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले दु:खी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 21:16 IST

Nagpur News राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपूर : राज्यातील राजकीय भूकंपानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्यांदा त्यावर सूचक भाष्य केले आहे. आपला देश, हा समाज हा दुखी आत्म्यांचा महासागर आहे. जे मंत्री होणार होते ते आता त्यांना संधी मिळणार की नाही या विचाराने दु:खी आहे. कारण एवढी गर्दी झाली आहे. हे इच्छुक अगोदर सूट बूट शिवून तयार होते व आपला क्रमांक कधी येतो याची वाट बघत होते. आता सूट आहे, मात्र त्याचं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. एखाद्या सार्वजनिक सभागृहाप्रमाणे मंत्रीमंडळाची क्षमतादेखील वाढविता येत नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे आयोजित गुरुवंदना कार्यक्रमादरम्यान ते गुरुवारी सायंकाळी बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला आ.रामदास आंबटकर, मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे, महामंत्री डॉ.सतिश चाफले प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात लोक दु:खाच्या महासागरात आहेत. आमदार झाले नाही म्हणून नगरसेवक दु:खी आहेत, मंत्री झाले नाही म्हणून आमदार दु:खी आहेत व चांगले खाते मिळाले नाही म्हणून मंत्री दु:खी असल्याचे दिसून येते. शेवटी जे आहे त्यात समाधान मानणे महत्त्वाचे असते, असे गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी यांनी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील राजकारणावरदेखील भाष्य केल. राजकारण हे विद्यापीठ व महाविद्यालयांपासून दूर ठेवले पाहिजे. शैक्षणिक कॅम्पसमध्ये पक्षांच्या राजकारणाला थारा देऊ नये. शिक्षक निश्चितच राजकारणात जाऊ शकतात, मात्र शैक्षणिक परिसरांमध्ये त्याला येऊ देऊ नका, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवड व नियुक्ती झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडवाविद्यापीठांमध्ये भविष्यातील आव्हाने व उद्योगक्षेत्राच्या गरजा लक्षात ठेवून अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैतिक व आर्थिकदृष्ट्या विद्यार्थी सक्षम होतील असे शिक्षण दिले पाहिजे. नागपूर विद्यापीठात शिक्षणक्षेत्र व उद्योगक्षेत्रात समन्वय दिसून येत नाही. विद्यार्थीदशेतच कौशल्य देत अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण