नागपूर : कामठी रोडवरील गुरुद्वाराजवळ गेल्या ५ महिन्यापासून आरयूपीचे काम बंद आहे. आतापर्यंत केवळ १५ मीटर कॉँक्रिटची स्लॅब टाकण्यात आली आहे. ५ महिन्यात केवळ जॅकेटींग झाले आहे.
या रेल्वे पुलाची अवस्था खस्ता होत चालली असल्याने त्याला मजबूत करण्यासाठी बांधकाम करण्यात येत आहे. परंतु या कामाची गती मंद आहे. निर्माणाचा वेग लक्षात घेता या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसुन येते. आरयुपीवरून ट्रेन जाते. असे असताना आरयुपीला लाकडी पाट्यांचा टेका दिला आहे. मध्ये रेल्वेच्या मंडळ मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या या आरयुपीचे अनेक महिन्यापासून काम रखडले असल्याने लोकांना भरपूर त्रास होत आहे.
आरयुपीच्या मेंटेनन्सच्या कामासंदर्भात रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जॅकेटींगचे काम झाले आहे. त्यानंतर स्ट्रेसिंग होईल, त्यानंतर स्लॅब टाकण्यात येईल. गर्डर लावल्यानंतर काँक्रिटीकरण करण्यात येईल. त्याच्यानंतर क्युरींग होईल, गर्डर काढण्यात येईल. हे काम मार्चच्या शेवटपर्यंत होईल. रस्त्याच्या उपयोग करणाऱ्या नागरिकांना या तांत्रिक बाबींशी काहीही देणेघेणे नाही. लोकांचा आक्षेप आहे की या कामासाठी एवढा वेळ का लागतो आहे. रस्ता बंद असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आरयुपीजवळ रेल्वेचे रुग्णालय सुद्धा आहे. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला फेरा मारून यावे लागत आहे. रेल्वे इंजिनिअरींग शाखा असतानाही काम कुठे रखडले आहे, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.