शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आचारी पळाला, वऱ्हाडी उपाशी

By admin | Updated: February 26, 2015 02:18 IST

लग्न लागायला केवळ काही मिनिटे शिल्लक असताना वऱ्हाड्यांसाठी भोजन तयार करणारा आचारीच पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाणे हद्दीतील मानेवाडा रोड येथे घडला.

नागपूर : लग्न लागायला केवळ काही मिनिटे शिल्लक असताना वऱ्हाड्यांसाठी भोजन तयार करणारा आचारीच पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाणे हद्दीतील मानेवाडा रोड येथे घडला. आरोपी आचाऱ्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण तयार न करता वर-वधू पक्षाचे ६५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. सत्यशील ऊर्फ घोलू शंभरकर रा. चंद्रमणीनगर जादूमहाल रोड असे आरोपी आचाऱ्याचे नाव आहे. बबन कांबळे (६५) रा. जोगीनगर असे फिर्यादी पीडिताचे नाव आहे. बबन कांबळे यांचा मुलगा अनय याचा विवाह दिलीप पाटील रा. पार्वतीनगर यांची मुलगी कोमल हिच्याशी मानेवाडा रोडवरील स्वाती लॉन येथे २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठरले होते. आरोपी सत्यशील याला भोजन तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला. ८५ हजार रुपयामध्ये सौदा पक्का झाला. अ‍ॅडवान्स म्हणून पाच हजार रुपये दिले. काही दिवसानंतर सामान घेण्यासाठी ४० हजार रुपये दिले. लग्नाच्या दोन दिवसांपूवी पुन्हा २० हजार रुपये दिले, असे एकूण ६५ हजार रुपये देऊन झाले. लग्नाचा दिवस उजाडला. दुपारी वर-वधू पक्षाची मंडळी लॉनवर जेवणाची तयारी वघण्यासाठी गेले असता. आचारी कुठेच नव्हता. त्यामुळे त्याला फोन लावण्यात आला. तेव्हा त्याने मोबाईलवर सांगितले की, आज दोघांकडील लग्नाचे आॅर्डर आहेत. त्यामुळे लॉनमध्ये स्वयंपाक न करता बाहेर दोन्हींचा स्वयंपाक सुरू आहे, सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था नीट होईल, तुम्ही काळजी करू नका. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वर-वधीू पक्षाची मंडली आपल्या कामाला लागली. मात्र सायंकाळी ५ वाजता आचाऱ्याला पुन्हा फोन लावला असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला आणि पैशे घेऊन पोबारा केला. इकडे वऱ्हाडी यायला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत काय करावे, हा प्रश्न होता. तेव्हा धावपळ करुन ऐन वेळेवर दुसऱ्या आचाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. स्वयंपाक झाला, परंतु तोपर्यंत चांगलाच उशीर झाला होता. अर्धेअधिक वऱ्हाडी उपाशी गेले. आचाऱ्याने केलेल्या या फसवणुकीमुळे वधू-वर मंडळींचे आर्थिक नुकसान तर झालेच, परंतु त्याहूनही अधिक त्यांच्या मान सन्मानालाही धक्का पोहोचला. (प्रतिनिधी) पोलिसांनी घेतली पीडिताचीच उलटतपासणी एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे प्रचंड मानसिक धक्का पोहोलेले पीडित वराचे वडील बबन कांबळे हे न्यायाच्या अपेक्षेने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. त्या अवस्थेतही त्यांनी आपली आपबिती सांगितली, परंतु पोलिसांनी पीडिताचे शांतपणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचीच उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली. फिर्यादीने लिखित तक्रार अर्ज दिला. तेव्हा त्यात चूक काढून पुन्हा नव्याने अर्ज लिहून आणण्यास आले. तासाभरानंतर पुन्हा नव्याने तक्रार अर्ज लिहून पोलिसांकडे सोपविण्यात आली. परंतु अजूनपर्यंत या तक्रार अर्जावर कुठलाही कारवाई झालेली नाही.