शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आचारी पळाला, वऱ्हाडी उपाशी

By admin | Updated: February 26, 2015 02:18 IST

लग्न लागायला केवळ काही मिनिटे शिल्लक असताना वऱ्हाड्यांसाठी भोजन तयार करणारा आचारीच पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाणे हद्दीतील मानेवाडा रोड येथे घडला.

नागपूर : लग्न लागायला केवळ काही मिनिटे शिल्लक असताना वऱ्हाड्यांसाठी भोजन तयार करणारा आचारीच पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाणे हद्दीतील मानेवाडा रोड येथे घडला. आरोपी आचाऱ्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण तयार न करता वर-वधू पक्षाचे ६५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. सत्यशील ऊर्फ घोलू शंभरकर रा. चंद्रमणीनगर जादूमहाल रोड असे आरोपी आचाऱ्याचे नाव आहे. बबन कांबळे (६५) रा. जोगीनगर असे फिर्यादी पीडिताचे नाव आहे. बबन कांबळे यांचा मुलगा अनय याचा विवाह दिलीप पाटील रा. पार्वतीनगर यांची मुलगी कोमल हिच्याशी मानेवाडा रोडवरील स्वाती लॉन येथे २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठरले होते. आरोपी सत्यशील याला भोजन तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला. ८५ हजार रुपयामध्ये सौदा पक्का झाला. अ‍ॅडवान्स म्हणून पाच हजार रुपये दिले. काही दिवसानंतर सामान घेण्यासाठी ४० हजार रुपये दिले. लग्नाच्या दोन दिवसांपूवी पुन्हा २० हजार रुपये दिले, असे एकूण ६५ हजार रुपये देऊन झाले. लग्नाचा दिवस उजाडला. दुपारी वर-वधू पक्षाची मंडळी लॉनवर जेवणाची तयारी वघण्यासाठी गेले असता. आचारी कुठेच नव्हता. त्यामुळे त्याला फोन लावण्यात आला. तेव्हा त्याने मोबाईलवर सांगितले की, आज दोघांकडील लग्नाचे आॅर्डर आहेत. त्यामुळे लॉनमध्ये स्वयंपाक न करता बाहेर दोन्हींचा स्वयंपाक सुरू आहे, सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था नीट होईल, तुम्ही काळजी करू नका. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वर-वधीू पक्षाची मंडली आपल्या कामाला लागली. मात्र सायंकाळी ५ वाजता आचाऱ्याला पुन्हा फोन लावला असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला आणि पैशे घेऊन पोबारा केला. इकडे वऱ्हाडी यायला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत काय करावे, हा प्रश्न होता. तेव्हा धावपळ करुन ऐन वेळेवर दुसऱ्या आचाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. स्वयंपाक झाला, परंतु तोपर्यंत चांगलाच उशीर झाला होता. अर्धेअधिक वऱ्हाडी उपाशी गेले. आचाऱ्याने केलेल्या या फसवणुकीमुळे वधू-वर मंडळींचे आर्थिक नुकसान तर झालेच, परंतु त्याहूनही अधिक त्यांच्या मान सन्मानालाही धक्का पोहोचला. (प्रतिनिधी) पोलिसांनी घेतली पीडिताचीच उलटतपासणी एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे प्रचंड मानसिक धक्का पोहोलेले पीडित वराचे वडील बबन कांबळे हे न्यायाच्या अपेक्षेने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. त्या अवस्थेतही त्यांनी आपली आपबिती सांगितली, परंतु पोलिसांनी पीडिताचे शांतपणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचीच उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली. फिर्यादीने लिखित तक्रार अर्ज दिला. तेव्हा त्यात चूक काढून पुन्हा नव्याने अर्ज लिहून आणण्यास आले. तासाभरानंतर पुन्हा नव्याने तक्रार अर्ज लिहून पोलिसांकडे सोपविण्यात आली. परंतु अजूनपर्यंत या तक्रार अर्जावर कुठलाही कारवाई झालेली नाही.