शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

त्रस्त नवरोबाचा नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:56 IST

कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देन्यायासनावर खुर्ची फेकली : जोरजोराने ओरडून शांतता भंग केली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.कृष्णा सुंदरलाल श्रीवास (३५) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, तो गणेशपेठ येथील रहिवासी आहे. त्याने २०१५ मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून, ती याचिका प्रलंबित आहे. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायाधीश पलक जमादार यांच्यासमक्ष सुनावणी होती. त्यासाठी तो न्यायालयात आला होता. कुटुंब न्यायालय वकील संघटनेचे उपाध्यक्ष व प्रत्यक्षदर्शी अ‍ॅड. श्याम अंभोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १.३० च्या सुमारास श्रीवास आरडाओरड करीत न्यायालयात आला.प्रवेशद्वारावरील पोलिसांना हुलकावणी देऊन तो थेट पहिल्या माळ्यावर चढला. दरम्यान, त्याने पक्षकारांना न्यायालय प्रकरणांची माहिती देणाऱ्या संगणकावर हेल्मेट आदळले. तेथून पुढे येऊन त्याने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या कार्यालयाची फायबरची खुर्ची पहिल्या माळ्यावरून खाली फेकली. त्यामुळे खुर्ची तुटून निकामी झाली व खाली उभ्या वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर तो ओरडत न्या. जमादार यांच्या न्यायालयात गेला. त्याने तेथील फायबरची खुर्ची उचलून ताकदीने न्यायासनावर फेकली. त्यामुळे न्यायाधीशांची वजनी लाकडी खुर्चीही मागे पलटली व आसनावरील काच फुटला. ती मधल्या सुटीची वेळ असल्यामुळे न्या. जमादार चेंबरमध्ये बसून होत्या. परिणामी, मोठा अनर्थ टळला.श्रीवासला ताब्यात घेण्यात न्यायालयातील पोलिसांनी विलंब केला. त्यामुळे त्याने एवढ्या गंभीर स्वरूपाचा हैदोस घातला. न्यायासनावर खुर्ची फेकेपर्यंत कुणीही धावून त्याला पकडले नाही. त्याने हा हैदोस घालण्यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. श्रीवासला न्या. जमादार यांच्या न्यायालयात पकडून सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.कडक सुरक्षा नाहीबार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदीपे यांनी कुटुंब न्यायालयात कडक सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहिती दिली. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे न्यायालयात कधीही गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारची घटना त्याचाच पुरावा असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय