शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून घ्यावे : भय्याजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:52 IST

आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देहिंदू साम्राज्य दिनोत्सवानिमित्त ऑनलाईन उद्बोधन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुमारे ३०० किल्ले होते. त्यापैकी केवळ नातेवाईक म्हणून त्यांनी कुणाला किल्लेदार बनवले नाही. शासनव्यवस्थेत नात्यापेक्षा व्यक्तीच्या गुणांना जास्त महत्त्व दिले. आजच्या राजकारणातदेखील त्यांचे ते वर्तन दिशा दाखविणारे आहे. कुठल्याही राजाने सजग कसे राहायला हवे, याचा आदर्श त्यांनी मांडला. एक राजा म्हणून त्यांनी राज्यकारभाराची ब्ल्यू प्रिंटच जगासमोर ठेवली. नारे, भाषणातून नव्हे तर आदर्श व्यवहारातून आस्था जागृत होते. आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी ऑनलाईन उद्बोधन केले.शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले. त्यांनी आपल्या शौर्याचा उपयोग देशहितासाठीच केला. कोणत्याही नेतृत्वाच्या यशस्वीतेचे काही टप्पे असतात. त्याचे सुरुवातीचे जीवन कसे राहिले, परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता, आस्था व श्रद्धेचे विषय या गोष्टी यात महत्त्वाचे असतात.शिवाजी महाराज धर्मासाठी लढले व देशासाठी जगले. शिवरायांच्या मनात कधीच व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. केवळ स्वराज्य सुरक्षित राहण्याची अपेक्षा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांना स्वत: राजा बनायचे नव्हते. जनता व मार्गदर्शकांच्या आग्रहापोटी त्यांनी होकार दिला होता. आस्था वाढते तेव्हा विश्वास निर्माण होतो. असाच विश्वास महाराजांबाबत कोट्यवधी जनतेच्या मनात आहे. स्वराज्यात शिस्त होती व भेदभाव नव्हता. कोणतेही लक्ष्य प्राप्त करायचे असेल तर निर्भयपणे समोर मार्गक्रमण केले पाहिजे, हीच शिकवण शिवरायांनी नेहमी दिली, असे भय्याजी जोशी म्हणाले.शिवाजी महाराजांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला होता. सामान्य जनतेमध्ये अविश्वास राहिला तर कोणताही राजा समाजाला पुढे नेऊ शकत नाही, याची त्यांना जाण होती. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजाने परत एकदा आत्मविश्वासाने उभे राहावे व आसुरी शक्तींचा हिमतीने सामना करावा, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज