शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत अ‍ॅन्जिओग्राफीचा शासनाचा निर्णय नाही

By admin | Updated: June 13, 2017 02:03 IST

ज्या रुग्णाची ‘अ‍ॅन्जिओग्राफी’नंतर ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ किंवा ‘बायपास सर्जरी’ करण्याची गरज पडत नाही,...

अभिमन्यू निसवाडे : हजार अ‍ॅन्जिओग्राफीच्या रुग्णांमधून २९५ रुग्णांचे शुल्क केले परतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या रुग्णाची ‘अ‍ॅन्जिओग्राफी’नंतर ‘अ‍ॅन्जिओप्लास्टी’ किंवा ‘बायपास सर्जरी’ करण्याची गरज पडत नाही, त्या रुग्णाचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत कोणताही क्लेम यशस्वी होत नाही. यामुळे त्यांना स्वत:च्या पैशाने रोगनिदान करावे लागते, ही बाब महाराष्ट्रभर सर्व रुग्णालयात सारखीच असून याच तत्त्वावर चालविण्यात येते. जर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये क्लेम प्राप्त झाला नाही, तर रुग्णांचे पैसे संस्थेला भरावे लागतात आणि संस्थेमध्ये मोफत अ‍ॅन्जिओग्राफी करण्यात यावी, असा शासनाचा कुठलाच निर्णय नसल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सांगितले.‘लोकमत’ने ‘पाच हजार भरा, तरच अ‍ॅन्जिओग्राफी’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तावर निसवाडे यांनी प्रशासनाची बाजू मांडली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ८ जून २०१७ पर्यंत एक हजार रुग्णांवर अ‍ॅन्जिओग्राफी करण्यात आली. त्यापैकी २९५ रुग्णांना प्रति रुग्ण पाच हजार रुपये प्रमाणे अ‍ॅन्जिओग्राफीचे पैसे परत करण्यात आले आहेत. तर ३२९ रुग्णांवर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोगचिकित्सा विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये ‘कोरोनरी आरट्री डिसीज’ असल्याची शंका निर्माण झाल्यावर रुग्णांना भरती करून ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ करण्यात येते. ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ केल्यानंतर ज्या रुग्णांमध्ये आजार आढळतो अशा रुग्णांना अ‍ॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीसाठी रुग्णालयात भरती करण्यात येते. त्याच रुग्णांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत क्लेम आल्यानंतर ‘अ‍ॅन्जिओग्राफी’चे भरलेले शुल्क परत केले जाते. रुग्णांकडून कुठलेही पैसे उकळले जात नाही, असेही ते म्हणाले.