शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 23:15 IST

कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे.

ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्यास टाळाटाळमनपा अधिकारी म्हणताहेत, पोस्टाने अर्ज पाठवा!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. त्यासाठी वरिष्ठांचा आदेश असल्याचा बहाणा केला जात असून, पोस्टाने अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे, स्वहस्ते अर्ज स्वीकारताना संक्रमणाची भीती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोस्टमनच्या हातूनच लेटर स्वीकारायचे आहे. तेव्हा तेथून संक्रमण होणार नाही का, असा सवाल आहे.शहरातील आरटीआय कार्यकर्ता सचिन खोब्रागडे गेल्या १५ दिवसापासून एक अर्ज घेऊन मनपाचे चक्कर कापत आहेत. परंतु, संक्रमणाचा काळ बघता सामान्य प्रशासन विभागाने अर्ज स्वीकारणे बंद केल्याचे सांगत, त्यांना परत पाठविले जात आहे. या बाबतीत खोब्रागडे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे तक्रार केली आहे.आशा वर्कर्ससंदर्भात हवी आहे माहितीखोब्रागडे यांना आशा वर्कर्ससंदर्भात माहिती हवी होती. कोरोना संक्रमणाच्या काळात उच्च न्यायालयाने आशा वर्कर्सना दैनिक २०० रुपये मानधन देण्याचे स्पष्ट केले होते. या संदर्भातच आरटीआयद्वारे त्यांना माहिती हवी आहे. संक्रमणाच्या काळात किती आशा वर्कर्सना या योजनेचा लाभ झाला? केंद्र सरकारने कोरोना संदर्भात केलेल्या विमा योजनेत किती आशा वर्कर्सना सहभागी केले, याची माहिती त्यांना हवी होती.मनपामध्ये आतापर्यंत ४०० लोक संक्रमित झाले आहेत. त्यामुळेच, येथे येणाºयांना केवळ महत्त्वाचे काम घेऊनच या असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीआयचे अर्ज आमच्या ग्रीवन्स अ‍ॅपवरही पाठविता येऊ शकतात. पोस्ट आणि ईमेलद्वारेही हे अर्ज आम्ही स्वीकारत आहोत. टाळण्याच्या मागचा उद्देश सुरक्षेचा आहे आणि यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.निर्भय जैन, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRight to Information actमाहिती अधिकार