शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

‘आरटीई’ ची ढकलगाडी

By admin | Updated: April 30, 2015 02:17 IST

‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत घोळात घोळ सुरू आहेत.

नागपूर : ‘आरटीई’अंतर्गत (राईट टू एज्युकेशन) होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत घोळात घोळ सुरू आहेत. परंतु राज्य शासनातर्फे अद्यापही यावर ठोस निर्णयाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीदेखील यावर मौन बाळगले असून आता नेमके करावे तरी काय, असा प्रश्न पालकांना पडला आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आरटीई’अंतर्गत पहिल्या वर्गापासूनच प्रवेश देणे शाळांना बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.‘आॅनलाईन’ सोडत झाल्यानंतर ‘आरटीई’ प्रवेशामधील खरा गुंता सुरू झाला. शहरातील अनेक शाळांनी ‘एन्ट्री लेव्हल’ नर्सरी असल्याचे कारण देत पहिलीचे प्रवेश नाकारले तर दुसरीकडे ‘मेस्टा’ अंतर्गत (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन) येणाऱ्या ८० ते ९० शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत ‘नर्सरी’त प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे पालकांना वणवण हिंडावे लागत आहे. कुणी मुख्याध्यापकांकडे आर्जव करत आहे तर कुणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या असून ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा निर्णयदेखील झाला आहे. परंतु अद्याप याबाबतचे शासननिर्देश जारी झालेले नाहीत. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यास शासनाकडून विलंब का लावण्यात येत आहे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)