शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांना ज्या शाळा शिक्षण देतात, त्या शाळांना शासनातर्फे पैसा दिला जातो. शिक्षण हक्क कायदा ...

नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या विद्यार्थ्यांना ज्या शाळा शिक्षण देतात, त्या शाळांना शासनातर्फे पैसा दिला जातो. शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत शासनाने तरतूद केली आहे. पण, चार वर्षांपासून आरटीईत नोंदणीकृत शाळांना शासनाकडून प्रतिपूर्तीच मिळालेली नाही. शालेय शिक्षण विभागाने २०२१-२२ चा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण, शाळांनी प्रतिपूर्ती नाही, तोपर्यंत प्रवेश नाही, असा इशारा दिला आहे.

आरटीईमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांच्यासाठी जो निधी दिला जातो, त्यात केंद्र सरकारचा ६० टक्के व राज्य सरकारचा ४० टक्के वाटा असतो. केंद्र सरकार दरवर्षी हा निधी राज्य सरकारला देते. पण, राज्य सरकारकडून शाळांना हा निधी वितरित केलाच जात नसल्याचा आरोप शाळांच्या संचालकांनी केला आहे. शाळा संचालकांचा आरोप आहे की, राज्य सरकार आरटीईच्या प्रतिपूर्तीत योगदानच देत नाही. शासनाने २०१७-१८ मध्ये ५० टक्के, २०१८-१९ मध्ये २५ टक्के प्रतिपूर्ती शाळांना दिली. पण, २०१९-२० व २०२०-२१ या वर्षातील एक रुपयाही शाळांना दिलेला नाही.

विशेष म्हणजे, आरटीईत नोंदणीकृत असलेल्या बहुतांश शाळा या स्वयंअर्थसाहाय्यित आहे. शासनाकडून कुठलेही अनुदान या शाळांना मिळत नाही. विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शैक्षणिक शुल्काच्या भरवशावर संस्थाचालक शाळा चालवितात. कोरोनामुळे सलग १० महिन्यापासून शाळा बंद आहे. विद्यार्थ्यांकडून शाळांना शुल्क मिळालेले नाही. शाळा चालविणे संस्थाचालकांसाठी कठीण झाले आहे. अशा काळातही सरकारने आरटीईचा हक्काचा निधी शाळांना दिला नाही. अशात पुन्हा २०२१-२२ या सत्रासाठी आरटीईच्या प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर केल्याने, संस्थाचालकांमध्ये प्रचंड संताप आहे.

- शासनाकडून दखलच नाही

सलग चार वर्षांपासून आरटीईचा एक रुपया शाळांना मिळाला नाही. कोरोनाच्या काळात आम्ही अडचणीत असताना हक्काचा निधीसुद्धा दिला नाही. आम्ही आरटीईत मुलांना शिकवायला तयार आहोत. चार वर्षे हक्काचे पैसे मिळत नसतील, तर हा अन्याय कितपत सहन करायचा? नव्या सत्रासाठी आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण, यंदा प्रतिपूर्ती मिळणार नाही, तोपर्यंत प्रवेश देणार नाही.

- कपिल उमाळे, विभागीय सचिव, मेस्टा