शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शहरी नक्षलवादावर संघाचा प्रहार :देशाविरोधात रचताहेत षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठळक मुद्दे शिक्षणव्यवस्थेतील धोरणांबाबत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.शहरी माओवाद्यांच्या षडयंत्रात राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती किंवा समहू, दुर्बल वर्ग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी ओढण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून समाजात फुटीरता, हिंसा, द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ अशा घोषणा ज्या समूहांतून आल्या, त्यांचेच प्रमुख चेहरे अप्रिय घटनांमध्ये प्रमुखतेने आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून समोर आले. हिंसात्मक कारवायांचे पोषणकर्ते आता शहरी माओवादाला ढाल बनवत आंदोलनांत समोरच्या रांगांमध्ये दिसतात. शहरी माओवाद्यांची रचलेल्या जाळ्याचा सर्व घटनाक्रम केवळ विरोधकांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशविदेशांतील भारतविरोधी शक्तींच्या मदतीने रचण्यात आलेले मोठे षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी डॉ.भागवत यांनी केला.गांधी, आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवयावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. देशात नागरिकांनी कायदा व संविधान यांच्या मयार्देत रहायला हवे. आपले राजकारणी तसेच प्रत्येक व्यक्तीने पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे नेहमी स्मरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी नि:शस्त्रपणे दोन हात केले, असे डॉ.भागवत म्हणाले.नवीन शैक्षणिक धोरण कधी ?नवीन पिढीवर संस्कार करण्याची गरज आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांत पायाभूत सुसंस्कारांचा अभाव झाला आहे. शिक्षणाचे नवीन धोरण प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत वेळ हातातून निघून चालली आहे. नवीन युगात जे चांगले आहे ते खुल्या मनाने आत्मसात करत अभद्र गोष्टींपासून वाचण्यासाठी नवीन पिढीत विवेक निर्माण करावा लागेल, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnaxaliteनक्षलवादी