शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

शहरी नक्षलवादावर संघाचा प्रहार :देशाविरोधात रचताहेत षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठळक मुद्दे शिक्षणव्यवस्थेतील धोरणांबाबत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.शहरी माओवाद्यांच्या षडयंत्रात राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती किंवा समहू, दुर्बल वर्ग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी ओढण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून समाजात फुटीरता, हिंसा, द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ अशा घोषणा ज्या समूहांतून आल्या, त्यांचेच प्रमुख चेहरे अप्रिय घटनांमध्ये प्रमुखतेने आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून समोर आले. हिंसात्मक कारवायांचे पोषणकर्ते आता शहरी माओवादाला ढाल बनवत आंदोलनांत समोरच्या रांगांमध्ये दिसतात. शहरी माओवाद्यांची रचलेल्या जाळ्याचा सर्व घटनाक्रम केवळ विरोधकांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशविदेशांतील भारतविरोधी शक्तींच्या मदतीने रचण्यात आलेले मोठे षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी डॉ.भागवत यांनी केला.गांधी, आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवयावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. देशात नागरिकांनी कायदा व संविधान यांच्या मयार्देत रहायला हवे. आपले राजकारणी तसेच प्रत्येक व्यक्तीने पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे नेहमी स्मरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी नि:शस्त्रपणे दोन हात केले, असे डॉ.भागवत म्हणाले.नवीन शैक्षणिक धोरण कधी ?नवीन पिढीवर संस्कार करण्याची गरज आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांत पायाभूत सुसंस्कारांचा अभाव झाला आहे. शिक्षणाचे नवीन धोरण प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत वेळ हातातून निघून चालली आहे. नवीन युगात जे चांगले आहे ते खुल्या मनाने आत्मसात करत अभद्र गोष्टींपासून वाचण्यासाठी नवीन पिढीत विवेक निर्माण करावा लागेल, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnaxaliteनक्षलवादी