शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शहरी नक्षलवादावर संघाचा प्रहार :देशाविरोधात रचताहेत षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ठळक मुद्दे शिक्षणव्यवस्थेतील धोरणांबाबत नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शहरी नक्षलवादावर जोरदार प्रहार केला. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांना सुनियोजीत पद्धतीने वादाचे रूप दिले जात आहे. विद्यापीठांमधील वातावरण बिघडवणे सुरू आहे. शहरी माओवाद्यांकडून पाकिस्तान, इटली, अमेरिका यासारख्या देशात तयार झालेले संदेश प्रसारित करुन भारताच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धाची रचना केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.शहरी माओवाद्यांच्या षडयंत्रात राजकीय महत्वाकांक्षी व्यक्ती किंवा समहू, दुर्बल वर्ग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी ओढण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून समाजात फुटीरता, हिंसा, द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकड़े होंगे’ अशा घोषणा ज्या समूहांतून आल्या, त्यांचेच प्रमुख चेहरे अप्रिय घटनांमध्ये प्रमुखतेने आपल्या चिथावणीखोर भाषणांच्या माध्यमातून समोर आले. हिंसात्मक कारवायांचे पोषणकर्ते आता शहरी माओवादाला ढाल बनवत आंदोलनांत समोरच्या रांगांमध्ये दिसतात. शहरी माओवाद्यांची रचलेल्या जाळ्याचा सर्व घटनाक्रम केवळ विरोधकांचे सत्ताप्राप्तीचे राजकारण न राहता देशविदेशांतील भारतविरोधी शक्तींच्या मदतीने रचण्यात आलेले मोठे षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी डॉ.भागवत यांनी केला.गांधी, आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवयावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. देशात नागरिकांनी कायदा व संविधान यांच्या मयार्देत रहायला हवे. आपले राजकारणी तसेच प्रत्येक व्यक्तीने पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे नेहमी स्मरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सत्य आणि अहिंसेच्या जोरावर राजकारण केलं जाऊ शकतं, याची कल्पना फक्त आपल्याच देशातील व्यक्ती करू शकते. महात्मा गांधी यांनी ते करुन दाखवलं आहे. केवळ नैतिक बळाच्या आधारावर त्यांनी इंग्रजांशी नि:शस्त्रपणे दोन हात केले, असे डॉ.भागवत म्हणाले.नवीन शैक्षणिक धोरण कधी ?नवीन पिढीवर संस्कार करण्याची गरज आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमांत पायाभूत सुसंस्कारांचा अभाव झाला आहे. शिक्षणाचे नवीन धोरण प्रत्यक्ष लागू होण्याच्या प्रतिक्षेत वेळ हातातून निघून चालली आहे. नवीन युगात जे चांगले आहे ते खुल्या मनाने आत्मसात करत अभद्र गोष्टींपासून वाचण्यासाठी नवीन पिढीत विवेक निर्माण करावा लागेल, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnaxaliteनक्षलवादी