शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:32 IST

लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली

नागपूर : आर्य बाहेरून भारतात आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले असून, हा सिद्धांत संपूर्ण जगाने नाकारला आहे, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी सोमलवार शिक्षण संस्थेच्या संस्थापक दिन कार्यक्रमात बोलताना केला.

भारतात जात, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा अशी अनेक प्रकारची विविधता आहे. त्यामुळे भारतातील नागरिक भांडतात. परंतु परकीय आक्रमण झाल्यानंतर ते संघटित होऊन लढतात, हे इंग्रजांना कळले होते. परिणामी, त्यांनी भारतीयांना खोटा इतिहास सांगून त्यांच्यात भेदभावाचे वातावरण निर्माण केले. भारतात स्थानिक कोणीच नाही, ही निराधार गोष्ट त्यांनी मनात भरवली. द्रविडांनी भारतात आल्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हाकलून लावले. त्यानंतर आर्यांनी द्रविडांना बाहेर काढले. भारतात सर्वजण बाहेरूनच आले आहेत. भारतावर बाहेरच्या लोकांनीच राज्य केले आहे. राज्य करणे भारतीयांच्या रक्तात नाही, असे इंग्रजांनी सांगितले. हे असत्य त्यांनी आपल्या अज्ञानामुळे पसरवले. हा इतिहास खोटा आहे. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु, लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली.

केवळ पोट भरणे शिक्षणाचा उद्देश नाही. व्यक्तीला मनुष्य बनविणे, माणुसकीने जगण्याची कला शिकविण्यासाठी शिक्षण आहे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत