शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्य बाहेरून आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:32 IST

लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली

नागपूर : आर्य बाहेरून भारतात आले हे असत्य ब्रिटिशांनी रुजविले असून, हा सिद्धांत संपूर्ण जगाने नाकारला आहे, असा दावा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी सोमलवार शिक्षण संस्थेच्या संस्थापक दिन कार्यक्रमात बोलताना केला.

भारतात जात, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा अशी अनेक प्रकारची विविधता आहे. त्यामुळे भारतातील नागरिक भांडतात. परंतु परकीय आक्रमण झाल्यानंतर ते संघटित होऊन लढतात, हे इंग्रजांना कळले होते. परिणामी, त्यांनी भारतीयांना खोटा इतिहास सांगून त्यांच्यात भेदभावाचे वातावरण निर्माण केले. भारतात स्थानिक कोणीच नाही, ही निराधार गोष्ट त्यांनी मनात भरवली. द्रविडांनी भारतात आल्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हाकलून लावले. त्यानंतर आर्यांनी द्रविडांना बाहेर काढले. भारतात सर्वजण बाहेरूनच आले आहेत. भारतावर बाहेरच्या लोकांनीच राज्य केले आहे. राज्य करणे भारतीयांच्या रक्तात नाही, असे इंग्रजांनी सांगितले. हे असत्य त्यांनी आपल्या अज्ञानामुळे पसरवले. हा इतिहास खोटा आहे. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. परंतु, लोकांच्या मनातून ते काढण्यासाठी वेळ लागतोय, अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली.

केवळ पोट भरणे शिक्षणाचा उद्देश नाही. व्यक्तीला मनुष्य बनविणे, माणुसकीने जगण्याची कला शिकविण्यासाठी शिक्षण आहे, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत