शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

RSS Dasara Melava: राजकारणातील स्वार्थासाठी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न; सरसंघचालक मोहन भागवत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 11:49 IST

Mohan Bhagwat Speech in Dasara Melava: फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. नवीन पिढीपर्यंत सत्य पोहोचायला पाहिजे. व्यवस्थेसोबतच लोकांचे मन बदलण्याचे प्रयत्न झाले तरच जातीभेद दूर होईल असं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देOTT वर कसे कसे चित्रपट येतात. आता तर मुलांच्या हातीदेखील मोबाईल आले आहे. ओटीटीवर नियंत्रण नाही. लोकांना एकत्र जोडण्याची भाषा हवी व संवाद सकारात्मक असला पाहिजे. तिसऱ्या लाटेसाठीदेखील प्रतिकार सुरू आहे. ही लाट येणार नाही असे वाटते.

नागपूर - स्वातंत्र्य भेदरहित समाजातूनच टिकू शकतो. सनातन काळापासून एकात्मता ही भारताची शक्ती आहे. भारत विकासाच्या मार्गावर जात असताना इतिहास, व्यवस्था, वर्तमानाची निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न करत आहेत. प्राचीन मूल्यांवर हल्ला होतो. निंदा केली जाते व सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. अशा लोकांनी आता हातमिळावणीदेखील केली आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

संघाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. मोहन भागवत(RSS Mohan Bhagwat) पुढे म्हणाले की, भारतातील दोन राज्यांतील पोलीस एकमेकांशी युद्ध करतात हे अयोग्य आहे. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत ना..मग असले प्रकार का? संविधानाअंतर्गत आपण सर्वच एकाच देशाचे आहोत. व्यवस्था फेडरल असली तरी लोक फेडरल नाही. सत्तेत बसलेल्या लोकांकडून पोषक व्यवहार होत नाही, मग समाजाला दिशा कशी मिळणार? राजकारणातील स्वार्थासाठी काही लोक कपट करतात. असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. जाती, प्रदेश, भाषेच्या माध्यमातून देशात अराजकता उत्पन्न करण्याचे प्रयत्न होतात. तंत्रज्ञानाचा आधार घेत आगीत तेल ओतण्याचे काम होतं. OTT वर कसे कसे चित्रपट येतात. आता तर मुलांच्या हातीदेखील मोबाईल आले आहे. ओटीटीवर नियंत्रण नाही. देशात अमली पदार्थाचे जाळे वाढत आहे. त्यावर नियंत्रण नाही. त्यातून येणाऱ्या पैशांतून देशविरोधी कारवाया होतात. बिटकॉईनवर कोणत्या राष्ट्राचे नियंत्रण आहे. समाजहितासाठी या बाबींना नियंत्रित करण्याचे काम शासनाला करावेच लागेल असं त्यांनी सांगितले.

तसेच फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. नवीन पिढीपर्यंत सत्य पोहोचायला पाहिजे. व्यवस्थेसोबतच लोकांचे मन बदलण्याचे प्रयत्न झाले तरच जातीभेद दूर होईल. समाजातील भेद वाढविण्याची भाषा वापरायला नको. लोकांना एकत्र जोडण्याची भाषा हवी व संवाद सकारात्मक असला पाहिजे. मंदिर, पाणी, स्मशान एकच असायला हवे. सामाजिक समरसता व्हायलाच हवी. मनातून भेद जाण्यासाठी संवाद व्हायला हवा. अनौपचारिक चर्चा हवा. जयंती, पुण्यतिथी, विशेष उत्सव एकत्रित मिळून झाले पाहिजे असंही मोहन भागवत यांनी सांगितले.

देश नक्कीच कोरोनावर मात करेल

कोरोनामुळे नुकसान झाले. अनेक तरुण गेले. लोकांनी एकत्रित येत कोरोनाचा सामना व प्रतिकार केला. तिसऱ्या लाटेसाठीदेखील प्रतिकार सुरू आहे. ही लाट येणार नाही असे वाटते. जर आलीच तर परिणामकारक राहणार नाही. प्रत्येक गावात पाच ते सात कोरोनायोद्धा तयार व्हावे यासाठी संघाने देशपातळीवर प्रशिक्षण दिले आहे. देश नक्कीच कोरोनाला मात देईल. कोरोनामुळे आर्थिक क्षेत्रात नुकसान झाले आहे. परंतु लोकांमध्ये आर्थिक नुकसान भरून काढण्याचा आत्मविश्वास आहे असंही मोहन भागवत यांनी सांगितले.

सुधारलेल्या सवयी बदलू नका

अनेक खर्च आपण उगाच करतो. कोरोनात कमी पैशांत विवाह झाले. कोरोना जायच्या मार्गावर आहे. सुधारलेल्या सवयी परत बिघडवू नका. पर्यावरण, आरोग्य यावर भर द्यायला हवा. सर्व प्रकारच्या पॅथींना मान्यता मिळाली पाहिजे. पॅथीचा अहंकार असायला नको. मतभेद असावेत परंतु विरोध नको. सर्व आरोग्य पद्धतींचा समन्वय साधत सर्वसमावेशक उपचारपद्धती  तयार व्हावी. गावपातळीवर आरोग्यरक्षकांची व्यवस्था बनावी. सर्वांना सुलभ व स्वस्त आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी असं त्यांनी सांगितले.

हिंदू मंदिराची संपत्ती अहिंदुसाठी दिली जातेय

हिंदू समाजाच्या मंदिरांची स्थिती फारशी चांगली नाही. दक्षिणेतील मोठी मंदिरे सरकारच्या अखत्यारित आहेत. सरकारच्या अखत्यारित असलेले काही मंदिर खूप चांगले चालतात. भक्तांच्या अखत्यारित असलेले मंदिरदेखील उत्तम चालतात व समाजसेवादेखील करतात. जेथे असे नाही तेथे लूट सुरू आहे. हिंदू मंदिरांची संपत्ती अहिंदूंसाठी दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयदेखील आहे की मंदिराचे मालक देव असून पुजारी व्यवस्थापक आहे. सरकार काही काळच मंदिरांचे व्यवस्थापन चालवू शकते. नंतर ती परत द्यावी. याबाबत विचार व्हायला हवा. हिंदूंना जागृत करायला हवे असं आवाहनही मोहन भागतव यांनी दसरा मेळाव्यात केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघDasaraदसराMohan Bhagwatमोहन भागवत