शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

भाजपच्या विजयरथाला संघाचे बळ; मतदानाच्या मोहिमेचे मिळाले फळ

By योगेश पांडे | Updated: December 4, 2023 05:12 IST

भाजप समर्थनार्थ मतदान वाढावे, यासाठी राबविली मोहीम

नागपूर : मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीनही राज्यांतील निवडणुकांमधील भाजपच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येत आहे. परंतु, पडद्यामागून भाजपाच्या निवडणुकांच्या ‘मिशन’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण ताकदीने बळ दिले होते. २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे स्वयंसेवकांनी ‘शत - प्रतिशत’ मतदानासाठी स्वयंसेवकांनी व्यापक मोहीम चालविली. याचाच परिणाम म्हणून विचारांनी भाजपचे समर्थन करणारे, मात्र एरवी मतदानासाठी न निघणारे मतदार बुथपर्यंत पोहोचले व भाजप उमेदवारांना कौल दिला.सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे भाजपाचा प्रचार केला होता. तर २०१९मध्ये संघातर्फे मार्गदर्शकाची भूमिका घेण्यात आली. भाजपाचा उघडपणे प्रचार तर संघाने टाळला. मात्र, भाजपाच्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांकडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, यासाठी मोहीमच राबविली.

निवडणुकांची घोषणा होण्याअगोदरच संघातर्फे मोहिमेचे नियोजन झाले होते. संघातर्फे तीनही राज्यांत प्रांतनिहाय बैठकी घेण्यात आल्या. अगदी शाखास्तरावरही मतदार संपर्काचा आराखडा तयार करण्यात आला. या मोहिमेमुळे तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपाला मोठी मदत झाली. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे, यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले होते.

सरसंघचालकांच्या आवाहनानंतर वाढला प्रतिसाद

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात विजयादशमीच्या भाषणादरम्यान मतदानासंदर्भात आवाहन केले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न होतील. मात्र, अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवत मतदानासाठी नागरिकांनी गेले पाहिजे, असे ते म्हणाले होते. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करावे, असे सूचक आवाहन त्यांनी केले होते. यानंतर स्वयंसेवकांनी आणखी सखोल नियोजन करत भाजपचे कुठेही नाव न घेता अदृश्य प्रचारावर भर दिला होता.

भाजपासाठी थेट आवाहन नाही, पण...

तीनही राज्यांत संघ स्वयंसेवक जनतेमध्ये जात होते. मात्र, प्रत्यक्ष भाजपाचे नाव घेऊन प्रचार न करता जनता व विशेषत: तरुणांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. देशाच्या प्रगतीसाठी चांगल्या उमेदवारांना पाठिंबा दिला पाहिजे, तसेच मतदान करणे किती आवश्यक आहे व एका मतामुळे काय फरक पडू शकतो, इत्यादी मुद्द्यांवर भर देण्यात येत आला होता.‘सोशल मीडिया’चा पुरेपूर वापर

संघाने या मोहिमेसाठी ‘सोशल मीडिया’चा अतिशय नियोजनपूर्वक वापर केला. केंद्रीय पातळीवरून येणारे संदेश काही मिनिटांत शाखा पातळीवर पोहोचावे, यासाठी व्यवस्था उभारण्यात आली होती. ‘फेसबुक’, ‘ट्वीटर’चाही मोठ्या प्रमाणावर वापर झाला.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ