शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

अयोध्या निकालासंदर्भात संघाचा ‘दक्ष’ पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:09 IST

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम निर्णय देणार आहे. यानंतर देशातील वातावरण खराब होऊ नये व सामाजिक सौहार्द जपला जावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देसामाजिक सौहार्द जपण्यासाठी नियोजन परिवारामधील देशभरातील संघटनांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय लवकरच अंतिम निर्णय देणार आहे. यानंतर देशातील वातावरण खराब होऊ नये व सामाजिक सौहार्द जपला जावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशभरात शांतता राहावी यासाठी संघाने नियोजन केले असून यासंदर्भात रचनादेखील उभी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे निर्णय हिंदूंच्या बाजूने आला तर जल्लोषावर नियंत्रण ठेवण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादप्रकरणाची सुनावणी नुकतीच संपवली. सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार असल्याने त्याआधी या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रचारक वर्गाची हरिद्वार येथील नियोजित बैठक दिल्ली येथे घेण्याचा निर्णय घेतला. राममंदिरप्रकरणी न्यायालयाचा निर्णय काहीही आला तरी जनतेने त्याचा स्वीकार करावा, निर्णयानंतर देशात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी ‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून केले.दुसरीकडे अगदी दिल्लीपासून ते शाखापातळीपर्यंत संघाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांची यासंदर्भात बैठकदेखील झाली आहे. निकाल काहीही आला तरी त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणार नाही. तसेच हिंदूंच्या बाजूने सकारात्मक निकाल आला तर जल्लोष हा नियंत्रित असावा याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबतच संवेदनशील भागांमध्ये सामाजिक बंधूभाव कामय राहावा यासाठी संवाद-संपर्कावर भर देण्यात यावा, असे निर्देशदेखील देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘सोशल मीडिया’वर जपून व्यक्त व्हाबजरंग दल, विहिंपकडून अनेकदा तीव्र प्रतिक्रिया देण्यात येतात. मात्र या प्रकरणाच्या निर्णयानंतर देशातील वातावरण संतुलित ठेवण्यासाठी या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील कार्यकर्त्यांसाठी सूचना जारी केली आहे. जर हिंदू समाजाच्या बाजूने निर्णय आला तर उत्साह मर्यादेबाहेर जाता कामा नये. हा निर्णय कुणाचा जय-पराजय याचा नसून इतिहासातील सत्यता स्वीकारण्याचा राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्ता- पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नये. ‘सोशल मीडिया’वर जपून व्यक्त व्हावे, नकारात्मक, उत्तेजनात्मक ‘पोस्ट’ करू नये. इतरांच्या अशा ‘पोस्ट’ला ‘लाईक’ किंवा ‘शेअर’ करू नये, असे बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक सोहन सोलंकी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAyodhyaअयोध्या