शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी तलावाला मजबूत करण्यासाठी २१ कोटी रुपयांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. तसेच दगडही उखडू लागले आहेत. तलावाच्या मजबुतीकरणासाठी २१ कोटी ६ लाख ९२ हजार ८४३ रुपयांची आवश्यकता आहे. मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने तलावाला मजबूत करण्यासाठी संबंधित निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. निधी जास्त असल्याने रााज्य सरकारकडून विशेष अनुदानाची मागणी करण्याची तयारी मनपाने केली आहे.

तलावाच्या लागूनच मेट्रो रेल्वेचे पीलर टाकण्यात आले आहे. यामुळे तलावाला भेगा पडल्या असून याला लागून असलेल्या परिसरातील झाडांनाही नुकसान पोहोचले आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार नागरिकांनी मनपाकडे केली. प्रकरण न्यायालयातही पोहोचले. यानंतर जलसंपदा विभागाने तलावाला मजबूत बनवण्यासाठी सविस्तर योजना तयार करण्याची जबाबदारी उचलली. तलावाच्या जीर्ण भिंतीला दुरुस्त करण्यासाठी ३ कोटी १४ लाख ५८ हजार ४६ रुपयाची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मेट्रो रेल्वे प्राधिकरणला ३.३५ कोटी रुपयाचा भार उचलावा लागेल. तर उर्वरित १७ कोटी ७१ लाख ९२ हजार ८४१ रुपये राज्य सरकारला मागण्यात येईल.

प्रस्तावात स्पष्ट म्हटले आहे की, मनपा संबंधित प्रकल्पासाठी कुठलाही निधी देणार नाही. मनपाच्या देखरेखीखाली तलावाचे मजबुतीकरण होईल. प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्रदान करून पुढील कारवाई केली जाईल. जसजसे राज्य सरकारकडून निधी मिळेल, तसतसे तलावाच्या धरणाला मजबूत केले जाईल.

बॉक्स

एनडीएसच्या जवानांना मिळणार एक्सटेंशन

मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)च्या मदतीने शहरात अतिक्रमण कारवाई, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक जप्ती, मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई आदी केल्या जात आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये १०० जवानांचे कंत्राट संपले. यादरम्यान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. त्यामुळे एक्स्टेंशन मिळू शकले नाही. सध्या केवळ ८० जवानांच्या भरवशावर शहरात कारवाई सुरु आहे. २०१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १८० जवान कार्यरत होते. परंतु १०० लाेकांचे कंत्राट संपल्याने अडचण निर्माण झाली. १ डिसेंबर २०१७ पासून १८ नोव्हेंबर २०२० दरम्यान एनडीएसने विविध प्रकारच्या कारवाई करून ८ कोटी १६ लाख ३८ हजार ४५० रुपयाचे उत्पन्न मिळविले. तर यांच्या मानधनावर ७ कोटी ४६ लाख ९५ हजार ८६३ रुपये खर्च झाले. तरीही एनडीएस ६९ लाख ४२ हजार ५८७ रुपयाने नफ्यात राहिले. एनडीएसमध्ये माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मनपाला फायदा आहे.