शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अंबाझरी तलावाला मजबूत करण्यासाठी २१ कोटी रुपयांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. तसेच दगडही उखडू लागले आहेत. तलावाच्या मजबुतीकरणासाठी २१ कोटी ६ लाख ९२ हजार ८४३ रुपयांची आवश्यकता आहे. मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने तलावाला मजबूत करण्यासाठी संबंधित निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. निधी जास्त असल्याने रााज्य सरकारकडून विशेष अनुदानाची मागणी करण्याची तयारी मनपाने केली आहे.

तलावाच्या लागूनच मेट्रो रेल्वेचे पीलर टाकण्यात आले आहे. यामुळे तलावाला भेगा पडल्या असून याला लागून असलेल्या परिसरातील झाडांनाही नुकसान पोहोचले आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार नागरिकांनी मनपाकडे केली. प्रकरण न्यायालयातही पोहोचले. यानंतर जलसंपदा विभागाने तलावाला मजबूत बनवण्यासाठी सविस्तर योजना तयार करण्याची जबाबदारी उचलली. तलावाच्या जीर्ण भिंतीला दुरुस्त करण्यासाठी ३ कोटी १४ लाख ५८ हजार ४६ रुपयाची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मेट्रो रेल्वे प्राधिकरणला ३.३५ कोटी रुपयाचा भार उचलावा लागेल. तर उर्वरित १७ कोटी ७१ लाख ९२ हजार ८४१ रुपये राज्य सरकारला मागण्यात येईल.

प्रस्तावात स्पष्ट म्हटले आहे की, मनपा संबंधित प्रकल्पासाठी कुठलाही निधी देणार नाही. मनपाच्या देखरेखीखाली तलावाचे मजबुतीकरण होईल. प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्रदान करून पुढील कारवाई केली जाईल. जसजसे राज्य सरकारकडून निधी मिळेल, तसतसे तलावाच्या धरणाला मजबूत केले जाईल.

बॉक्स

एनडीएसच्या जवानांना मिळणार एक्सटेंशन

मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)च्या मदतीने शहरात अतिक्रमण कारवाई, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक जप्ती, मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई आदी केल्या जात आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये १०० जवानांचे कंत्राट संपले. यादरम्यान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. त्यामुळे एक्स्टेंशन मिळू शकले नाही. सध्या केवळ ८० जवानांच्या भरवशावर शहरात कारवाई सुरु आहे. २०१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १८० जवान कार्यरत होते. परंतु १०० लाेकांचे कंत्राट संपल्याने अडचण निर्माण झाली. १ डिसेंबर २०१७ पासून १८ नोव्हेंबर २०२० दरम्यान एनडीएसने विविध प्रकारच्या कारवाई करून ८ कोटी १६ लाख ३८ हजार ४५० रुपयाचे उत्पन्न मिळविले. तर यांच्या मानधनावर ७ कोटी ४६ लाख ९५ हजार ८६३ रुपये खर्च झाले. तरीही एनडीएस ६९ लाख ४२ हजार ५८७ रुपयाने नफ्यात राहिले. एनडीएसमध्ये माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मनपाला फायदा आहे.