शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

अंबाझरी तलावाला मजबूत करण्यासाठी २१ कोटी रुपयांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऐतिहासिक अंबाझरी तलावाची स्थिती अतिशय खराब होऊ लागली आहे. भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. तसेच दगडही उखडू लागले आहेत. तलावाच्या मजबुतीकरणासाठी २१ कोटी ६ लाख ९२ हजार ८४३ रुपयांची आवश्यकता आहे. मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने तलावाला मजबूत करण्यासाठी संबंधित निधीचा प्रस्ताव तयार केला आहे. निधी जास्त असल्याने रााज्य सरकारकडून विशेष अनुदानाची मागणी करण्याची तयारी मनपाने केली आहे.

तलावाच्या लागूनच मेट्रो रेल्वेचे पीलर टाकण्यात आले आहे. यामुळे तलावाला भेगा पडल्या असून याला लागून असलेल्या परिसरातील झाडांनाही नुकसान पोहोचले आहे. संबंधित प्रकरणाची तक्रार नागरिकांनी मनपाकडे केली. प्रकरण न्यायालयातही पोहोचले. यानंतर जलसंपदा विभागाने तलावाला मजबूत बनवण्यासाठी सविस्तर योजना तयार करण्याची जबाबदारी उचलली. तलावाच्या जीर्ण भिंतीला दुरुस्त करण्यासाठी ३ कोटी १४ लाख ५८ हजार ४६ रुपयाची गरज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मेट्रो रेल्वे प्राधिकरणला ३.३५ कोटी रुपयाचा भार उचलावा लागेल. तर उर्वरित १७ कोटी ७१ लाख ९२ हजार ८४१ रुपये राज्य सरकारला मागण्यात येईल.

प्रस्तावात स्पष्ट म्हटले आहे की, मनपा संबंधित प्रकल्पासाठी कुठलाही निधी देणार नाही. मनपाच्या देखरेखीखाली तलावाचे मजबुतीकरण होईल. प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्रदान करून पुढील कारवाई केली जाईल. जसजसे राज्य सरकारकडून निधी मिळेल, तसतसे तलावाच्या धरणाला मजबूत केले जाईल.

बॉक्स

एनडीएसच्या जवानांना मिळणार एक्सटेंशन

मनपाच्या न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड (एनडीएस)च्या मदतीने शहरात अतिक्रमण कारवाई, स्वच्छता मोहीम, प्लास्टिक जप्ती, मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई आदी केल्या जात आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये १०० जवानांचे कंत्राट संपले. यादरम्यान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. त्यामुळे एक्स्टेंशन मिळू शकले नाही. सध्या केवळ ८० जवानांच्या भरवशावर शहरात कारवाई सुरु आहे. २०१ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी १८० जवान कार्यरत होते. परंतु १०० लाेकांचे कंत्राट संपल्याने अडचण निर्माण झाली. १ डिसेंबर २०१७ पासून १८ नोव्हेंबर २०२० दरम्यान एनडीएसने विविध प्रकारच्या कारवाई करून ८ कोटी १६ लाख ३८ हजार ४५० रुपयाचे उत्पन्न मिळविले. तर यांच्या मानधनावर ७ कोटी ४६ लाख ९५ हजार ८६३ रुपये खर्च झाले. तरीही एनडीएस ६९ लाख ४२ हजार ५८७ रुपयाने नफ्यात राहिले. एनडीएसमध्ये माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मनपाला फायदा आहे.