शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

रिपाइं एकीकरण फसलेला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:47 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरमेश जीवने : एकच पक्ष असावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.रिपाइं मुक्ती आंदोलन या अभियानांतर्गत सोमवारी आमदार निवास येथे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या विविध कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उपरोक्त विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर लोकमतशी बोलताना जीवने यांनी सांगितले की, एकीकरण हा फसलेला प्रयोग आहे. तेव्हा आता एकच पक्ष हाच महत्त्वाचा आहे. त्यादिशेने आम्ही काम करीत आहोत. विविध गटांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. या अंतर्गतच आजची बैठकही बोलावण्यात आली होती. त्यात केवळ प्रतिनिधिक स्वरुपात पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते.रंजना वासे यांच्या अध्यक्षतेखली बैठक पार पडली. यावेळी निमंत्रक अशोक मेश्राम, अमित भालेराव, प्रशिक आनंद, सीमा अलोने, क्षितिज गायकवाड, श्रीकांत ओगले, राहुल जारोंडे, जयबुद्ध लोहकरे, राजदीप नगरारे आदी उपस्थित होते.गवई यांच्या पक्षात सर्व गट विसर्जित व्हावेसध्या नेमका कोणता रिपब्लिकन पक्ष खरा आहे, अशी विचारणा केली असता रमेश जीवने यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुºया पत्रावर आधारित ज्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे पहिले अध्यक्ष एन. शिवराज, दुसरे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, तिसरे अध्यक्ष रा.सू. गवई आणि सध्या कर्नाटकचे माजी आमदार एन. राजेंद्रन हे अध्यक्ष आहेत. तर डॉ. राजेंद्र गवई हे सरचिटणीस आहेत. हा पक्षच खरा असून या पक्षातच सर्व गट विसर्जित व्हावे. परंतु या पक्षाचे नेतृत्व करणाºयांनीही पक्षाला बंदिस्त करून ठेवता कामा नये. ते समाजासाठी खुले करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर