शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं एकीकरण फसलेला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:47 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरमेश जीवने : एकच पक्ष असावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी एकत्रित येऊन एकीकरण करण्याचा प्रयोग हा सपशेल फसलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकीकरणाच्या मागे न लागता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा एकच पक्ष असावा आणि त्यात सर्वांनीच सामील व्हावे, असे मत रिपाइं मुक्ती आंदोलनाचे मुख्य संयोजक रमेश जीवने यांनी व्यक्त केले.रिपाइं मुक्ती आंदोलन या अभियानांतर्गत सोमवारी आमदार निवास येथे रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेल्या विविध कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उपरोक्त विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर लोकमतशी बोलताना जीवने यांनी सांगितले की, एकीकरण हा फसलेला प्रयोग आहे. तेव्हा आता एकच पक्ष हाच महत्त्वाचा आहे. त्यादिशेने आम्ही काम करीत आहोत. विविध गटांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. या अंतर्गतच आजची बैठकही बोलावण्यात आली होती. त्यात केवळ प्रतिनिधिक स्वरुपात पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित करण्यात आले होते.रंजना वासे यांच्या अध्यक्षतेखली बैठक पार पडली. यावेळी निमंत्रक अशोक मेश्राम, अमित भालेराव, प्रशिक आनंद, सीमा अलोने, क्षितिज गायकवाड, श्रीकांत ओगले, राहुल जारोंडे, जयबुद्ध लोहकरे, राजदीप नगरारे आदी उपस्थित होते.गवई यांच्या पक्षात सर्व गट विसर्जित व्हावेसध्या नेमका कोणता रिपब्लिकन पक्ष खरा आहे, अशी विचारणा केली असता रमेश जीवने यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुºया पत्रावर आधारित ज्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. त्याचे पहिले अध्यक्ष एन. शिवराज, दुसरे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, तिसरे अध्यक्ष रा.सू. गवई आणि सध्या कर्नाटकचे माजी आमदार एन. राजेंद्रन हे अध्यक्ष आहेत. तर डॉ. राजेंद्र गवई हे सरचिटणीस आहेत. हा पक्षच खरा असून या पक्षातच सर्व गट विसर्जित व्हावे. परंतु या पक्षाचे नेतृत्व करणाºयांनीही पक्षाला बंदिस्त करून ठेवता कामा नये. ते समाजासाठी खुले करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर