शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'; पळून जाणाऱ्या १३९९ मुला-मुलींना आईवडिलांना सोपविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2023 19:19 IST

Nagpur News रेल्वेच्या संपत्तीची आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात भरकटलेल्या, पळून जाणाऱ्या १३९९ मुलामुलींना त्यांच्या पालकांना सोपविले आहे.

नागपूर : रेल्वेच्या संपत्तीची आणि प्रवाशांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात भरकटलेल्या, पळून जाणाऱ्या १३९९ मुलामुलींना त्यांच्या पालकांना सोपविले आहे. आरपीएफने या कामगिरीचा आढावा नुकताच पत्रकारांना दिला आहे.

रेल्वेच्या संपत्तीची तसेच प्रवाशांची आणि त्यांच्या साहित्याची सुरक्षा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आरपीएफच्या खांद्यावर असते. त्यासाठी रेल्वेस्थानकाच्या आतबाहेर आणि धावत्या रेल्वेत आरपीएफचे जवान सतर्कतेने जबाबदारी वाहताना दिसतात. हे करताना कुणी संशयित व्यक्ती, वस्तू दिसल्यास ताब्यात घेऊन चाैकशीनंतर त्या संबंधाने योग्य ती कारवाई केली जाते. आरपीएफ दरवर्षी अमली पदार्थ प्रतिबंधक तसेच अन्य काही मोहीम राबवित असते. अशाच पैकी घरून पळून जाणाऱ्या किंवा कुणी फूस लावून नेणाऱ्या मुलामुलींना पकडण्यासाठी आरपीएफतर्फे दरवर्षी ऑपरेशन नन्हे फरिश्ते राबविले जाते. आरपीएफच्या जवानांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत आरपीएफने हे ऑपरेशन राबविले. त्यात ९४९ मुले आणि ४५० मुली अशा एकूण १३९९ मुलामुलींना पकडण्यात आले.

भविष्य अंधकारमय होण्यापासून वाचले

विशेष म्हणजे, आरपीएफच्या हाती लागलेल्या मुला-मुलींपैकी काही जण रागाच्या भरात घरून पळून आले होते. कुणाला फूस लावून पळविले जात होते तर कुणी चमकदमक पाहून भरकटल्यासारखे कुठे तरी निघून जाण्याच्या तयारीने रेल्वेत बसले होते. चुकून ते असामाजिक तत्त्वांच्या हाती लागले असते तर त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले असते. आरपीएफच्या जवानांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले. यात चाइल्डलाइन तसेच रेल्वे पोलिस आणि रेल्वेच्या अन्य कर्मचाऱ्यांचीही मदत झाल्याचे आरपीएफने म्हटले आहे.

पकडण्यात आलेल्या मुलांची विभागवार माहिती

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ४४१ मुले आणि १७४ मुलामुलींना वाचविण्यात आले. भुसावळ विभाग १५० मुले, १३४ मुली, पुणे विभागात २३३ मुले आणि ५२ मुली, सोलापूर विभागात ३६ मुले आणि २२ मुली तर नागपूर विभागात ८९ मुले आणि ६८ मुले आरपीएफच्या हाती लागली.

------

टॅग्स :Policeपोलिस