शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

हा मार्ग धोक्याचा आहे! कळमेश्वर-काटोल-नागपूर मार्ग झाला खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 21:50 IST

व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले, कोण घेणार दखल?

आशिष सौदागर/लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा मार्ग असून कळमेश्वर, काटोल, नरखेड ते वरुड तालुक्यापर्यंतच्या वाहतुकीचा दुवा म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील वाढती वाहतूक व औद्योगिकीकरण, शिक्षण झोन लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे तातडीने नुतनीकरण करणे गरजेचे होते. नागपूर शहरातील जुन्या काटोल रोड नाक्यापासून ते कळमेश्वर न.प.च्या हद्दीपर्यंत या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याच १५ कि.मी.च्या अंतरात अनेक शाळा, महाविद्यालये, मोठ्या शैक्षणिक संस्था, दोन धार्मिक स्थळे आहे. त्यामुळे येथे सकाळी ९ ते रात्री ९ या काळात वाहतूक अधिक असते. रस्त्यात साधा अपघात झाला तर जाम लागतो.पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने जड वाहनामुळे या मार्गावरील डांबर उखडत चालले आहे. गत आठ वर्षात या मार्गावर अनेक जणांचा बळी गेला. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गत पाच वर्षापासून मागणी आहे. मात्र कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही.राज्याचे गृृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघा पर्यंत हा मार्ग जातो. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा धापेवाडा येथे जाताना याच मार्गावरून जावे लागते. यासोबतच पशुसंवर्धन मंत्री केदार यांना नागपूर येथून कळमेश्वर (मतदारसंघ) येथे जाता या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तीन महत्त्वाचे मंत्री या मार्गावरून नेहमी जात असताना या मार्गाचे रुंदीकरण किंवा किमान व्यवस्थित डागडुजी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला रस का नाही,  हाही एक प्रश्नच आहे. मधल्या काळात गडकरी यांनी या मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी पुढाकार घेतला होता. मात्र या कामाला फारसा वेग आला नाही.नागपूर-कळमेश्वर मार्गाने गत दहा वर्षात वाहतूक वाढली आहे. मात्र मार्गाची रुंदी आहे तीच आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. फेटरी परिसरात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे.- धनश्री मुकेश ढोमणे, सरपंच फेटरी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर