शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

हा मार्ग धोक्याचा आहे! कळमेश्वर-काटोल-नागपूर मार्ग झाला खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 21:50 IST

व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देअपघात वाढले, कोण घेणार दखल?

आशिष सौदागर/लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : व्हीआयपी रोड समजला जाणारा नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्ग सध्या धोक्याचा झाला आहे. या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा मार्ग असून कळमेश्वर, काटोल, नरखेड ते वरुड तालुक्यापर्यंतच्या वाहतुकीचा दुवा म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील वाढती वाहतूक व औद्योगिकीकरण, शिक्षण झोन लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे तातडीने नुतनीकरण करणे गरजेचे होते. नागपूर शहरातील जुन्या काटोल रोड नाक्यापासून ते कळमेश्वर न.प.च्या हद्दीपर्यंत या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याच १५ कि.मी.च्या अंतरात अनेक शाळा, महाविद्यालये, मोठ्या शैक्षणिक संस्था, दोन धार्मिक स्थळे आहे. त्यामुळे येथे सकाळी ९ ते रात्री ९ या काळात वाहतूक अधिक असते. रस्त्यात साधा अपघात झाला तर जाम लागतो.पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असल्याने जड वाहनामुळे या मार्गावरील डांबर उखडत चालले आहे. गत आठ वर्षात या मार्गावर अनेक जणांचा बळी गेला. या मार्गाचे रुंदीकरण करण्याची गत पाच वर्षापासून मागणी आहे. मात्र कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही.राज्याचे गृृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघा पर्यंत हा मार्ग जातो. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा धापेवाडा येथे जाताना याच मार्गावरून जावे लागते. यासोबतच पशुसंवर्धन मंत्री केदार यांना नागपूर येथून कळमेश्वर (मतदारसंघ) येथे जाता या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तीन महत्त्वाचे मंत्री या मार्गावरून नेहमी जात असताना या मार्गाचे रुंदीकरण किंवा किमान व्यवस्थित डागडुजी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला रस का नाही,  हाही एक प्रश्नच आहे. मधल्या काळात गडकरी यांनी या मार्गाच्या सिमेंटीकरणासाठी पुढाकार घेतला होता. मात्र या कामाला फारसा वेग आला नाही.नागपूर-कळमेश्वर मार्गाने गत दहा वर्षात वाहतूक वाढली आहे. मात्र मार्गाची रुंदी आहे तीच आहे. त्यामुळे अपघात वाढले आहे. फेटरी परिसरात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे.- धनश्री मुकेश ढोमणे, सरपंच फेटरी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर