शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 11:41 PM

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी अभिवादन : त्यांच्यासारखेच आज देशाला नेते हवेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.संघाच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर ही भूमिका मांडण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांना केवळ संविधाननिर्माते या चौकटीत बसवणे अयोग्य ठरेल. त्यांनी युगान्युगे जाती व वर्ण व्यवस्थेच्या जोखडात फसलेल्या भारताला याबाबत विचार करायला भाग पाडले. ते महान शिक्षक, अर्थतज्ज्ञ, वक्ता, द्रष्टे नेता होते. शालेय जीवनात त्यांना सर्व प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागता. मात्र त्यांनी दृढनिष्ठा ठेवली व ते स्वनिर्मित व्यक्तिमत्त्वाचे आदर्श उदाहरण बनले. भारतात समानता यावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. तत्कालीन भारतातील अस्पृश्य व वंचितांची स्थिती लक्षात घेता त्यांनी आरक्षणाची व्यवस्था तयार केली. सोबतच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील कार्य केले, असे संघाने अभिवादन करताना म्हटले आहे.बाबासाहेब राष्ट्रनिर्माता होतेडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वास्तविकपणे केवळ दलित नेतेच नव्हते, तर राष्ट्रनिर्माता व जागतिक नेते होते. त्यांनीच सामाजिक न्यायाचे सिद्धांत दिले. भारत निर्माणाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचे मौलिक योगदान होते. आजच्या युगात त्यांच्या विचार अंगिकारण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या प्रगतीसाठी डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांची आवश्यकता असल्याचे मत संघातर्फे मांडण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ