शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
2
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
3
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
4
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
5
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
6
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
7
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
8
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
9
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
10
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
11
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
12
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
13
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
14
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
15
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
16
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
17
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
18
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
19
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
20
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!

संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:43 IST

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी अभिवादन : त्यांच्यासारखेच आज देशाला नेते हवेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.संघाच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर ही भूमिका मांडण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांना केवळ संविधाननिर्माते या चौकटीत बसवणे अयोग्य ठरेल. त्यांनी युगान्युगे जाती व वर्ण व्यवस्थेच्या जोखडात फसलेल्या भारताला याबाबत विचार करायला भाग पाडले. ते महान शिक्षक, अर्थतज्ज्ञ, वक्ता, द्रष्टे नेता होते. शालेय जीवनात त्यांना सर्व प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागता. मात्र त्यांनी दृढनिष्ठा ठेवली व ते स्वनिर्मित व्यक्तिमत्त्वाचे आदर्श उदाहरण बनले. भारतात समानता यावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. तत्कालीन भारतातील अस्पृश्य व वंचितांची स्थिती लक्षात घेता त्यांनी आरक्षणाची व्यवस्था तयार केली. सोबतच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील कार्य केले, असे संघाने अभिवादन करताना म्हटले आहे.बाबासाहेब राष्ट्रनिर्माता होतेडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वास्तविकपणे केवळ दलित नेतेच नव्हते, तर राष्ट्रनिर्माता व जागतिक नेते होते. त्यांनीच सामाजिक न्यायाचे सिद्धांत दिले. भारत निर्माणाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचे मौलिक योगदान होते. आजच्या युगात त्यांच्या विचार अंगिकारण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या प्रगतीसाठी डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांची आवश्यकता असल्याचे मत संघातर्फे मांडण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ