शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

संघाची भूमिका, बाबासाहेब ‘अंत्योदय’चे जनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 23:43 IST

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी अभिवादन : त्यांच्यासारखेच आज देशाला नेते हवेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे जनक खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असल्याची भूमिका मांडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करत संघातर्फे शब्दांजलीदेखील अर्पण करण्यात आली.संघाच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर ही भूमिका मांडण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांना केवळ संविधाननिर्माते या चौकटीत बसवणे अयोग्य ठरेल. त्यांनी युगान्युगे जाती व वर्ण व्यवस्थेच्या जोखडात फसलेल्या भारताला याबाबत विचार करायला भाग पाडले. ते महान शिक्षक, अर्थतज्ज्ञ, वक्ता, द्रष्टे नेता होते. शालेय जीवनात त्यांना सर्व प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागता. मात्र त्यांनी दृढनिष्ठा ठेवली व ते स्वनिर्मित व्यक्तिमत्त्वाचे आदर्श उदाहरण बनले. भारतात समानता यावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. तत्कालीन भारतातील अस्पृश्य व वंचितांची स्थिती लक्षात घेता त्यांनी आरक्षणाची व्यवस्था तयार केली. सोबतच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठीदेखील कार्य केले, असे संघाने अभिवादन करताना म्हटले आहे.बाबासाहेब राष्ट्रनिर्माता होतेडॉ.बाबासाहेब आंबेडकर हे वास्तविकपणे केवळ दलित नेतेच नव्हते, तर राष्ट्रनिर्माता व जागतिक नेते होते. त्यांनीच सामाजिक न्यायाचे सिद्धांत दिले. भारत निर्माणाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये बाबासाहेबांचे मौलिक योगदान होते. आजच्या युगात त्यांच्या विचार अंगिकारण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या प्रगतीसाठी डॉ.आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांची आवश्यकता असल्याचे मत संघातर्फे मांडण्यात आले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ