शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

शेतकºयांना शाश्वत शेतीकडे नेण्याची भूमिका : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:48 IST

वातावरणातील बदलांमुळे शेतीला फटका बसताना दिसून येत आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांना जीवदेखील गमवावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदलांमुळे शेतीला फटका बसताना दिसून येत आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांना जीवदेखील गमवावे लागले. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. शेतीच्या विकासासाठी सेंद्रीय प्रणालीचा उपयोग आवश्यक आहे. त्यामुळेच सेंद्रीय कृषीप्रणालीवर सरकार लक्ष केंद्रीत करत आहे. शेतकºयांना शाश्वत शेतीकडे नेण्याची भूमिका आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यात गेल्या तीन वर्षांत कृषी विकास दर हा १२.५ टक्क्यांवर गेला आहे. याअगोदर हा दर उणेमध्ये राहायचा. राज्यातील शेतकºयांचा विकास सिंचनाच्या माध्यमातून होऊ शकतो. राज्यातील सर्व विभागांमधील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. शेती आणि शेतकºयांच्या मुद्यांना शासनाने प्राधान्य दिले आहे व त्यामुळे गुंतवणूकदेखील वाढत आहे. गेल्या ३ वर्षात १ लाख विहिरी, ५० हजार शेततळी आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २१ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यात शासनाला यश आले आहे. शाश्वत सिंचनाचा लाभ तसेच अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शंभर प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. गोसेखुर्दसारखे राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक तेवढा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील प्रकल्पाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे गोसेखुर्दसारखा राष्ट्रीय प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.मागील कर्जमाफीत बँकांचाच फायदासंपुआच्या कालावधीत १० वर्षांअगोदर झालेल्या कर्जमाफीचा शेतकºयांना कमी व बँकांनाच अधिक फायदा झाला होता. अनेक बँकांनी तर पैसा अक्षरश: लुटला. ‘कॅग’च्या निर्देशांनुसार तेव्हाचे अतिरिक्त पैसे शासन आता बँकांकडून वसूल करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात शेतकºयांची कर्जमाफी करताना ती पारदर्शक राहील, यावर भर देण्यात आला असल्याचेदेखील ते म्हणाले.