शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

शेतकºयांना शाश्वत शेतीकडे नेण्याची भूमिका : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:48 IST

वातावरणातील बदलांमुळे शेतीला फटका बसताना दिसून येत आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांना जीवदेखील गमवावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदलांमुळे शेतीला फटका बसताना दिसून येत आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांना जीवदेखील गमवावे लागले. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. शेतीच्या विकासासाठी सेंद्रीय प्रणालीचा उपयोग आवश्यक आहे. त्यामुळेच सेंद्रीय कृषीप्रणालीवर सरकार लक्ष केंद्रीत करत आहे. शेतकºयांना शाश्वत शेतीकडे नेण्याची भूमिका आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यात गेल्या तीन वर्षांत कृषी विकास दर हा १२.५ टक्क्यांवर गेला आहे. याअगोदर हा दर उणेमध्ये राहायचा. राज्यातील शेतकºयांचा विकास सिंचनाच्या माध्यमातून होऊ शकतो. राज्यातील सर्व विभागांमधील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. शेती आणि शेतकºयांच्या मुद्यांना शासनाने प्राधान्य दिले आहे व त्यामुळे गुंतवणूकदेखील वाढत आहे. गेल्या ३ वर्षात १ लाख विहिरी, ५० हजार शेततळी आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २१ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यात शासनाला यश आले आहे. शाश्वत सिंचनाचा लाभ तसेच अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शंभर प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. गोसेखुर्दसारखे राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक तेवढा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील प्रकल्पाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे गोसेखुर्दसारखा राष्ट्रीय प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.मागील कर्जमाफीत बँकांचाच फायदासंपुआच्या कालावधीत १० वर्षांअगोदर झालेल्या कर्जमाफीचा शेतकºयांना कमी व बँकांनाच अधिक फायदा झाला होता. अनेक बँकांनी तर पैसा अक्षरश: लुटला. ‘कॅग’च्या निर्देशांनुसार तेव्हाचे अतिरिक्त पैसे शासन आता बँकांकडून वसूल करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात शेतकºयांची कर्जमाफी करताना ती पारदर्शक राहील, यावर भर देण्यात आला असल्याचेदेखील ते म्हणाले.