शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियांच्या मर्यादेवर रोबोटिक्सची मात : अभिनव देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:04 IST

मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.

ठळक मुद्देविज्ञान संस्कार शिबिरात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.विज्ञान भारतीद्वारे व नीरीच्या सहकार्याने नीरीच्या सभागृहात आठ दिवसीय ‘विज्ञान संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान संस्कार शिबिरामध्ये ‘कॅन रोबोट एंटर इन बॉडी अ‍ॅण्ड परफॉर्म ऑपरेशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपक्रमाच्या समन्वयिका वसुंधरा साठे विशेषत्वाने उपस्थित होत्या.रोबोटिक्स सर्जरीचा उगम कसा झाला हे सांगताना डॉ. अभिनव देशपांडे म्हणाले, युद्ध मैदानावरील रुग्णांपर्यंत डॉक्टर प्रत्यक्ष पोहचू शकत नसल्याने दुरवरून उपचार कसा होईल याचा विचार करताना अमेरिकेमध्ये रोबोटिक्स सर्जरीचा विचार करण्यात आला. यासंदभार्तील अभ्यास स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि नासा यांनी १९८० च्या दशकात केला व त्यामुळे रणमैदानावरील सैनिकांवर ‘टेलिप्रेजेंस’ म्हणजे दुरवरून रोबोट्सना आज्ञा करून प्रथमोपचार आणि अन्य छोट्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली, आणि त्यातून रोबोटिक्स सर्जरीचा उदय झाला.रोबोटिक सर्जरीची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. देशपांडे म्हणाले की, हे रोबोट्स केवळ मानवाच्या हातचे बाहुले आहे. रोबोट्सना स्वत:ची बुद्धी नसते. त्यामागे शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यचिकित्सकाची बुद्धी आणि कौशल्य असते. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी चिरा दिला जातो. रुग्णाचे रक्त कमी जाते. यामुळे इस्पितळात कमी दिवस रहावे लागते. शस्त्रक्रियेत अचूकता येते. रोबोटिक्स आर्मला संवेदना जाणवत नाही, त्यामुळे फार अभ्यास करून शस्त्रक्रिया करावी लागते व यंत्र महागडे असल्याने सामान्यांच्या आवाक्यात नाही, अशा काही त्रुटी त्यांनी यावेळी सांगितल्या.दुसऱ्या सत्रामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल व्हीएनआयटीचे प्रा. डॉ. कार्तिक बालसुंदन यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी नीरीच्या विविध प्रयोगशाळांना भेटी दिल्या. या शिबिरासाठी ३० शाळांमधील १६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. उपक्रमासाठी वसुंधरा साठे, वैदेही साठे, सतीश घारे, देहाडकर, एस एस गड, अजित शुक्ला, गिरीश जोशी, डॉ रश्मी शुक्ला, देवशीष जोशी, आशिष जैन, सुयोग गुर्जर, रोहित गणोरकर, नरेश चाफेकर हे परिश्रम घेत आहेत. नीरीतर्फे आशिष शर्मा, डॉ राजेश बिनीवाले यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Robotरोबोटtechnologyतंत्रज्ञानMedicalवैद्यकीय