शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शस्त्रक्रियांच्या मर्यादेवर रोबोटिक्सची मात : अभिनव देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:04 IST

मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.

ठळक मुद्देविज्ञान संस्कार शिबिरात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी हाताने करण्यात आलेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला मर्यादा पडतात. मात्र रोबोटिक सर्जरीमुळे या मर्यादा गळून पडतात. ‘रोबोटिक्स आर्म’ ३६० डिग्री वळत असल्याने, १२ पटींनी दृश्यांसह व अचूकतेसह रोबोटिक सर्जरी करता येते, अशी माहिती कर्करोग व रोबोटिक्स शल्यचिकित्सक डॉ. अभिनव देशपांडे यांनी दिली.विज्ञान भारतीद्वारे व नीरीच्या सहकार्याने नीरीच्या सभागृहात आठ दिवसीय ‘विज्ञान संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान संस्कार शिबिरामध्ये ‘कॅन रोबोट एंटर इन बॉडी अ‍ॅण्ड परफॉर्म ऑपरेशन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपक्रमाच्या समन्वयिका वसुंधरा साठे विशेषत्वाने उपस्थित होत्या.रोबोटिक्स सर्जरीचा उगम कसा झाला हे सांगताना डॉ. अभिनव देशपांडे म्हणाले, युद्ध मैदानावरील रुग्णांपर्यंत डॉक्टर प्रत्यक्ष पोहचू शकत नसल्याने दुरवरून उपचार कसा होईल याचा विचार करताना अमेरिकेमध्ये रोबोटिक्स सर्जरीचा विचार करण्यात आला. यासंदभार्तील अभ्यास स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि नासा यांनी १९८० च्या दशकात केला व त्यामुळे रणमैदानावरील सैनिकांवर ‘टेलिप्रेजेंस’ म्हणजे दुरवरून रोबोट्सना आज्ञा करून प्रथमोपचार आणि अन्य छोट्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली, आणि त्यातून रोबोटिक्स सर्जरीचा उदय झाला.रोबोटिक सर्जरीची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. देशपांडे म्हणाले की, हे रोबोट्स केवळ मानवाच्या हातचे बाहुले आहे. रोबोट्सना स्वत:ची बुद्धी नसते. त्यामागे शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्यचिकित्सकाची बुद्धी आणि कौशल्य असते. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे कमीत कमी चिरा दिला जातो. रुग्णाचे रक्त कमी जाते. यामुळे इस्पितळात कमी दिवस रहावे लागते. शस्त्रक्रियेत अचूकता येते. रोबोटिक्स आर्मला संवेदना जाणवत नाही, त्यामुळे फार अभ्यास करून शस्त्रक्रिया करावी लागते व यंत्र महागडे असल्याने सामान्यांच्या आवाक्यात नाही, अशा काही त्रुटी त्यांनी यावेळी सांगितल्या.दुसऱ्या सत्रामध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल व्हीएनआयटीचे प्रा. डॉ. कार्तिक बालसुंदन यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी नीरीच्या विविध प्रयोगशाळांना भेटी दिल्या. या शिबिरासाठी ३० शाळांमधील १६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. उपक्रमासाठी वसुंधरा साठे, वैदेही साठे, सतीश घारे, देहाडकर, एस एस गड, अजित शुक्ला, गिरीश जोशी, डॉ रश्मी शुक्ला, देवशीष जोशी, आशिष जैन, सुयोग गुर्जर, रोहित गणोरकर, नरेश चाफेकर हे परिश्रम घेत आहेत. नीरीतर्फे आशिष शर्मा, डॉ राजेश बिनीवाले यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Robotरोबोटtechnologyतंत्रज्ञानMedicalवैद्यकीय