शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नागपुरात वृक्षारोपण प्रकल्पाचे काम ठप्प? ११ हजार झाडे फक्त कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 13:36 IST

महानगरपालिकेने ४ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यादेश काढला. या अंतर्गत 'नीरी'च्या मागच्या रस्त्यावर फक्त ४५० झाडे लावण्यात आली. त्यानंतर, मात्र हे कामच बंद पडले. तर, दुसरीकडे विकासाच्या नावावर शहरातील अनेक झाडे तोडण्यात आली. 

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष

नागपूर : विकासाच्या नावाखाली करण्यात येत असलेल्या वृक्षतोडींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून प्रदुषणाचा स्तरही तितकाच झपाट्याने उंचावतो आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी वृक्षारोपण प्रकल्प हाती घेण्यात येतात. मात्र, हे वृक्षारोपणाकडे विशेष असे लक्ष दिले जात नसल्याचे दिसते. 

नागपूर शहरातील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा ११ हजार झाडे लावण्याकरता महानगरपालिकेने ४ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यादेश काढला. या अंतर्गत 'नीरी'च्या मागच्या रस्त्यावर फक्त ४५० झाडे लावण्यात आली. त्यानंतर, मात्र हे कामच बंद पडले. तर, दुसरीकडे विकासाच्या नावावर शहरातील अनेक झाडे तोडण्यात आली. 

महपालिकेने पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. यासाठी  ११ हजार २६० झाडे लावण्यासाठी ४ कोटी ९७ लाख ३ हजार २७५ रुपयांचे कंत्राट रेनबो ग्रीनर्स या संस्थेला देण्यात आले. त्याअंतर्गत वृक्षरोपणाला सुरुवातही झाली. सेल्फ वॉटरिंग सिर्टीम तंत्रज्ञानाद्वारे हे वृक्षारोपण हाती घेण्यात आले होते. मात्र, हळू-हळू महापालिकेला या कामाचा विसरच पडल्याचे चित्र आहे. 

वृक्षरोपणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महापालिकेला वारंवार सूचना दिल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसून नसल्याची खंत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. दोन वर्ष उलटुनही काम अद्याप सुरू झाले नसल्याने वृक्षरोपणासाठीचा निधी आलाच नाही का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक