शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रामझुला हिट ॲंड रनची आरोपी रितिका मालूला अटक; न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्यरात्रीनंतर केली अटक

By योगेश पांडे | Updated: September 26, 2024 10:04 IST

पोलिसांना तीनवेळा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून मालूला अटक करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

योगेश पांडेनागपूर : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज कारने रामझुला पुलावर दोन निष्पाप तरुणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या धनाढ्य व्यावसायिक रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (३९) हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास तिला अटक केली. रितिकाचा जामीन सत्र न्यायालयाने बुधवारी रद्द केला होता व तिला अटक करण्याची परवानगी दिली होती.

तहसील पोलिसांनी मालूविरोधात २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भादंवि कलम २७९ (निष्काळजीपणाने वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) या अदखलपात्र गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने मालूला त्याच दिवशी जामीन दिला होता. दरम्यान, तिच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळून आल्यामुळे पोलिसांनी २ मार्च रोजी एफआयआरमध्ये भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) व मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या दखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. परंतु, त्यानंतर पोलिसांना तीनवेळा प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाकडून मालूला अटक करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

हा अर्ज प्रलंबित असताना गेल्या ३० ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तहसील पोलिसांचा हलगर्जीपणा लक्षात घेता या अपघाताचा तपास राज्य 'सीआयडी'कडे हस्तांतरित केला. परिणामी, सत्र न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या विनंतीवरून या अर्जामधून तहसील पोलिसांना वगळण्याची व त्यात 'सीआयडी'चा समावेश करण्याची परवानगी दिली. रात्री दीड वाजताच्या सुमारास सीआयडीचे पथक मालूच्या वर्धमाननगर परिसरातील निवासस्थानी गेले व तेथून तिला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई करण्यात आली. तिला रात्री सिताबर्डी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. तेथून सीआयडीचे पथक तिला चौकशीसाठी घेऊन जाईल. गुरुवारी तिची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.