शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; वापरलेल्या मास्कपासून संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 12:23 IST

मास्क वापरल्यानंतर लाखो विषाणू व जीवाणू युक्त झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनासोबतच नागरिकांचीही जबाबदारीसुरक्षित विल्हेवाट लावण्याची गरज-सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे वापरलेले मास्क सुरक्षितरीत्या जाळावे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येकजण मास्क वापरायला लागला आहे. परंतु मास्क वापरल्यानंतर लाखो विषाणू व जीवाणू युक्त झालेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बाजारात मिळेल ते मास्क वापरत आहेत. मात्र बायोमेडिकल वेस्ट तज्ज्ञांच्या मते, वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची गरज आहे. असे न केल्यास संसर्गाची नवीन समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. याचे गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वापरलेल्या मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ज्ञांच्या मते, रुग्णालयात रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि मेडिकल स्टाफला या मास्कची जास्त गरज असते. रुग्णालयातून निघणाऱ्या बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावायची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्याचे काही नियम आहेत. मात्र शहरात आज जवळपास सर्वच लोक मास्क लावलेले दिसतात. मात्र, लाखोंच्या संख्येने वापरल्या जाणाºया या मास्कची विल्हेवाट कशी लावायची, याकडे कोणाचेही लक्ष नाही. सध्या बहुसंख्य नागरिक मास्क वापरत असल्याने घराघरात बायो मेडिकल वेस्ट निघू लागला आहे. त्यामुळे स्वत:ची सुरक्षा म्हणून जे लोक मास्क वापरतायेत. इतरांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावावी, अशी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. तज्ज्ज्ञांच्या मते, वापरलेले मास्क थेट घरातल्या डस्टबिनमध्ये टाकून मोकळे होता येणार नाही. योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे.-मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची पद्धतवापरलेल्या मास्कला पाण्यात ५ टक्के ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात ५ ते १० मिनिटे निर्जंतुक करा. मग कागदात गुंडाळून डस्टबिन मध्ये टाका.- एक टक्का सोडियम हायपोक्लोराइट आणि पाण्याचे द्रावण वापरून त्यात मास्क निर्जंर्तुक करून मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका.-जर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यात खोल खड्डा करून त्यात मास्क जमिनीत गाडून टाकावे..........कचरा संकलन करणाऱ्यांनाही धोकाथुंकीतून लाखो विषाणू किंवा जिवाणू मास्कच्या आतील बाजूस राहू शकतात. वापरलेले मास्क तसेच घरगुती कचºयात टाकले तर त्यामुळे घरापासून डम्पिंग यार्डपर्यंत तो कचरा हाताळणारे अनेक लोकं संक्रमित होण्याचा धोका वाढतो. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस