शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अंध ऋषिकेशने शोधली प्रकाशवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 10:52 IST

अंधारातून प्रकाशाची वाट गवसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा बोध एका शेतमजुराच्या अंध मुलाने घेतला. आज बारावीचा निकाल हाती आल्यावर समाजाला त्याची जिद्द आणि मेहनतीचा साक्षात्कार झाला.

ठळक मुद्देशेतमजुराच्या मुलाची शिकण्याची जिद्दध्येय आयएएस बनण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंधारातून प्रकाशाची वाट गवसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा बोध एका शेतमजुराच्या अंध मुलाने घेतला. आठव्या वर्गापासून त्याने गाव सोडून शहरात प्रगतीच्या वाटा शोधू लागला. आज बारावीचा निकाल हाती आल्यावर समाजाला त्याची जिद्द आणि मेहनतीचा साक्षात्कार झाला. ऋषिकेश अनिल अढाव असे या अंध विद्यार्थ्याचे नाव आहे. परिस्थिती आणि अपंगत्वावर मात करून त्याने ८५.३८ टक्के गुण मिळवीत कला शाखेत प्रथम येण्याचा मान मिळविला. भविष्यात आयएएसचे स्वप्न त्याने बाळगले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील उबाळखेड येथील ऋषिकेश अढाव हा जन्मांध आहे. वडील शेतमजूर, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. अंधत्वामुळे आपण शेतीही करू शकणार नाही? याची खंत त्याला होती. आठवीपर्यंत त्याने गावातच शिक्षण घेतले. शिक्षकांकडून त्याला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. नवव्या वर्गात गाव सोडून तो नागपुरात दाखल झाला. चोखामेळा वसतिगृहात राहून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे बाराव्या वर्गासाठी अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून त्याने बारावीची परीक्षा दिली. अभ्यासासाठी उपलब्ध असलेली ब्रेलची पुस्तके व आॅडिओ कॅसेट्सद्वारे त्याने अभ्यास केला.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८